शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

गोंदिया जिल्ह्यातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या २५ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देआंतरराज्य फेऱ्यांवर बंदी : शनिवारपासून सुरू झाली अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया आगारातून मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या २५ फेऱ्या शनिवारपासून (दि. २०) बंद रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, याबाबत शुक्रवारी (दि. १९) गोंदिया आगाराला तसे आदेश मिळाले आहेत. राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २० मार्चपासून येत्या ३१ मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, मध्य प्रदेशात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेस आता मध्य प्रदेशात जाणार नाहीत व अशात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांचा बसेसद्वारे असलेला संपर्क तुटणार आहे. या आदेशानुसार, गोंदिया आगारालाही शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी बसफेऱ्या बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश राज्याची सीमा जेमतेम २० किलोमीटर असून तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज गोंदियात येतात. यात बसने त्यांचा प्रवास जास्तीतजास्त प्रमाणात होतो. मात्र, आता बसफेऱ्या बंद पडल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. शिवाय, गोंदिया आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार यात शंका नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. गोंदिया आगारातून मध्य प्रदेश राज्यात एकूण २५ फेऱ्या जात होत्या. यामध्ये १ लांजी, १९ बालाघाट तर ५ रजेगावच्या फेऱ्या आहेत. मात्र, आता या आदेशानंतर या २५ फेऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. 

डोंगरगड फेरीही बंद मध्य प्रदेश राज्याला बस फेऱ्या जोडत असतानाच छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथेही गोंदिया आगाराची १ फेरी होती. मात्र, सध्या ती फेरीही बंद करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडासाठीही गोंदिया आगारातून बस जात होती. ती फेरीही २१ फेब्रुवारीपासून बंद असून, सध्या ती फेरी सावनेरपर्यंतच जात आहे. तिरोडा आगाराच्या ४ फेऱ्या बंद मध्य प्रदेश राज्यात गोंदिया आगाराच्या फेऱ्या जात असतानाच जिल्ह्यातीलच तिरोडा आगारातून ४ फेऱ्या बालाघाटला जात होत्या. मात्र, आता त्यांच्या या ४ फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. एकंदर दोन्ही आगारांकडून दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी असलेली ही सुविधा आता खंडित झाली आहे.

 

टॅग्स :state transportएसटी