शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटीसला करदात्या २४७५ शेतकऱ्यांचा ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा भरणा शासनाकडे केला आहे. 

ठळक मुद्देपीएम किसान पेन्शन योजना : ३१७१ शेतकरी ठरले होते अपात्र, प्रशासनाने बजावली होती नोटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे. मात्र काही करदाते आणि शासकीय नोकरीवर असलेले शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते. ही बाब केंद्र शासनाच्या लक्षात आल्यानंतर करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत मागविण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर यापैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम शासनाकडे जमा केली आहे. नोटीस बजाविल्यानंतर मानधनाची रक्कम परत करण्यासाठी करदाते शेतकरी पुढे येत आहे. या प्रक्रियेला गती सुद्धा आली होती. मात्र डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या प्रक्रियेत अडचण निर्माण झाली होती. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा भरणा शासनाकडे केला आहे. तर २४७५ शेतकऱ्यांकडून अद्यापही पैसे भरण्यात आले नाही. कोरोनाचा संसर्ग तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे यात विलंब होत असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

आतापर्यंत १ कोटी ३९ लाख रुपये वसूल

पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ शेतकरी अपात्र ठरले होते. यांना जिल्हा प्रशासनाने मानधनाचे पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली होती.नोटीस बजाविल्यानंतर ३१७१ शेतकऱ्यांपैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मानधनाचे पैसे  परत करण्यात अडचणी येत असल्याने अद्यापही २४७५ शेतकऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम परत होणे बाकी आहे. पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्यांमध्ये सर्वाधिक करदाते शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

दोन हजारांवर शेतकऱ्यांना अद्यापही लाभ नाही पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र यापैकी दोन हजारांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मानधनाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हे शेतकरी अद्यापही शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून मानधनाची रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली. यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी पैसे परत केले. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून सुद्धा मानधनाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनामुळे यात काही अडचण आली होती.- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी