शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

२२ चिमुकल्यांना केले पालकांच्या स्वाधीन

By admin | Updated: July 20, 2015 01:17 IST

आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे.

आॅपरेशन मुस्कान : अद्याप ३५ बालकांचा शोध सुरूचगोंदिया : आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी या पंधरवड्यात आणखी २२ चिमुकल्यांना हुकडून काढले असून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश मिळविले आहे. १ ते १५ जुलै दरम्यानच्या कालावधीत करण्यात आलेली ही कारवाई असून अद्याप बेपत्ता असलेल्या ३५ चिमुकल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. लहान मुला-मुलींचे अपहरण करून त्यांच्याकडून भीक मागविणे तसेच वाममार्गाला लावण्याचे प्रकार काहींकडून केले जातात. तर मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली मुला-मुलींच्या बेपत्ता व अपहरणाच्या या संख्येला लक्षात घेत राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू केली आहे. १ ते ३० जुलै या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार असून यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी यासाठी लावले आहेत. हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांमधील काही मुले पालकांकडे परत आली असल्यास त्यांची खात्री करून त्याबाबतची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात नेमलेले विशेष पथक हे दररोज अशा मुलांचा शोध घेऊन नियंत्रण कक्षात माहिती देत आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान जोमात सुरू आहे. या कामात पोलीस विभाग स्वयंसेवी संस्थाची मदत घेत आहे. तर हरविलेली किंवा घरातून निघून गेलेली मुले-मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करताना छायाचित्र काढून प्रसारीत केली जाणार आहेत.हरविलेल्या तसेच अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्यांबाबत मिळालेल्या आकडेवारीनुसार सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यात मागील पंधरवड्यात पोलिसांनी २२ चिमुकले शोधून काढले आहेत. अशाप्रकारे २३८ मुले व ४८२ मुली पोलिसांना मिळाल्या असून अद्याप १० मुले व २५ मुली बेपत्ता आहेत.पोलीसांनी आॅपरेशन मुस्कानला यशस्वी करण्याचा चंग बांधल्यामुळे या पंधरवाड्यात बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्यात त्यांना यश लाभले आहे. पोलिसांनी ठरविले तर कारवाईचे कोणतेही काम अशक्य नाही. परंतु पोलिस काही ठिकाणी दिरंगाई करीत असल्यामुळे अनेक प्रकरणे उघडकीस येत नसल्याचे प्रकार ही बघावयास मिळतात. (तालुका प्रतिनिधी)