शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत २०४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

By admin | Updated: February 4, 2016 01:53 IST

शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो.

ठिंबक व तुषार सिंचन : विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमदेवानंद शहारे गोंदियाशेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिल्या जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात धानपीक वगळता इतर शेती करण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचे प्रस्ताव व मंजूर प्रकरणांनुसार दिसून येते. मागील दोन वर्षांत ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा केवळ २०४ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे कृषी विभागाने दिलेल्या संख्येवरून दिसून येते.ठिंबक सिंचन म्हणून रोपांच्या मुळांवर विशिष्ट पद्धतीने थेंबथेंब पाणी देणे. तर तुषार सिंचन (स्प्रिंग कलर) म्हणजे रोपांच्या वरून विशिष्ट पद्धतीने फव्वारा पद्धतीने पाणी देणे, अशी सुटसुटीत व्याख्या केली जाऊ शकते. विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत यात सन २०१३-१४ मध्ये केवळ ५२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी त्यांना ६५.१४ लाख रूपयांचे अनुदानही देण्यात आले. तर सन २०१४-१५ मध्ये १५२ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यांना अनुदानापोटी २०.१३ लाख रूपये देण्यात आले. तर सन २०१५-१६ मधील २५१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सदर २५१ प्रस्तावित प्रस्तावांमध्ये आमगाव तालुक्यातील १०, अर्जुनी-मोरगार तालुक्यातील २५, देवरी तालुक्यातील ९, गोंदिया तालुक्यातील ५१, गोरेगाव तालुक्यातील २७, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९८, सालेकसा तालुक्यातील ८ व तिरोडा तालुक्यातील २२ प्रस्तावांचा समावेश आहे. हे सर्व प्रस्ताव ७ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान आॅनलाईन लिंकिंग करण्यात आले आहेत. मात्र यापैकी किती शेतकरी सदर योजना राबविण्यासाठी पुढे येतात, हे वेळेच सांगेल. लाभार्थ्याची पात्रतामागील दोन वर्षांपासून सदर योजना सुरू आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व ८ अ असावा. शेतात विहीर किंवा बोअरवेल असावी. जे पीक घ्यायचे आहे त्याची नोंद सातबारावर असावी. किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याने मौका तपासणी अंती पीक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. विद्युत पंपाची जोडणी असावी. सिंचन क्षेत्र ०.२० हेक्टरपेक्षा कमी नसावे. योजनेत अनुसूचित जातीसाठी १६ टक्के, अनुसूचीत जमातीसाठी ८ टक्के, अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी ३३ टक्के रक्कम उपयोगात आणावी तसेच लाभार्थ्याने यापूर्वी विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अत्यल्प म्हणजे ज्याची शेती एक हेक्टरपर्यंत व अल्प म्हणजे एक ते दोन हेक्टरपर्यंत शेती, असा अर्थ आहे.