शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

२०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे.

 नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी स्थितीत बंधाऱ्यांच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. मात्र बंधारे तयार केल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागांतर्गत २९४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ३९ बंधारे नादुरुस्त असल्यामुळे  हजारो हेक्टर शेती सिंचीत होऊ शकत नाही. पाटबंधारे विभागांतर्गत २०० कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे हे भग्नावस्थेत आहेत. शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहेत.  कोल्हापुरी बंधाऱ्यांची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे.

बांधकामाकडे लक्ष; देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्षn पाटबंधारे विभाग किंवा जिल्हा परिषद कोल्हापुरी बंधारे नवीन बांधकाम करण्याकडे विशेष लक्ष देते. नवीन बांधकामात अधिकाऱ्यांना मिळकत मोठी मिळत असल्याने ते नवीन कामाकडे लक्ष देतात. परंतु बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा बंधाऱ्यांचे काम पद्धतशीर व्हावे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

बंधाऱ्याच्या लोखंड प्लेट चोरी- बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या प्लेट चोरीला गेल्याने नदीचे पाणी अडून न राहता वाहून जाते. अनेक बंधाऱ्यांच्या प्लेट चोरीला गेल्याने  या बंधाऱ्यांमध्ये एकही वर्षी पाणी साठून राहत नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खिंड पडली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करून तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे. बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प