शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे.

 नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी स्थितीत बंधाऱ्यांच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. मात्र बंधारे तयार केल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागांतर्गत २९४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ३९ बंधारे नादुरुस्त असल्यामुळे  हजारो हेक्टर शेती सिंचीत होऊ शकत नाही. पाटबंधारे विभागांतर्गत २०० कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे हे भग्नावस्थेत आहेत. शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहेत.  कोल्हापुरी बंधाऱ्यांची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे.

बांधकामाकडे लक्ष; देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्षn पाटबंधारे विभाग किंवा जिल्हा परिषद कोल्हापुरी बंधारे नवीन बांधकाम करण्याकडे विशेष लक्ष देते. नवीन बांधकामात अधिकाऱ्यांना मिळकत मोठी मिळत असल्याने ते नवीन कामाकडे लक्ष देतात. परंतु बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा बंधाऱ्यांचे काम पद्धतशीर व्हावे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

बंधाऱ्याच्या लोखंड प्लेट चोरी- बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या प्लेट चोरीला गेल्याने नदीचे पाणी अडून न राहता वाहून जाते. अनेक बंधाऱ्यांच्या प्लेट चोरीला गेल्याने  या बंधाऱ्यांमध्ये एकही वर्षी पाणी साठून राहत नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खिंड पडली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करून तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे. बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प