शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे.

 नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी स्थितीत बंधाऱ्यांच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. मात्र बंधारे तयार केल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागांतर्गत २९४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ३९ बंधारे नादुरुस्त असल्यामुळे  हजारो हेक्टर शेती सिंचीत होऊ शकत नाही. पाटबंधारे विभागांतर्गत २०० कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे हे भग्नावस्थेत आहेत. शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहेत.  कोल्हापुरी बंधाऱ्यांची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे.

बांधकामाकडे लक्ष; देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्षn पाटबंधारे विभाग किंवा जिल्हा परिषद कोल्हापुरी बंधारे नवीन बांधकाम करण्याकडे विशेष लक्ष देते. नवीन बांधकामात अधिकाऱ्यांना मिळकत मोठी मिळत असल्याने ते नवीन कामाकडे लक्ष देतात. परंतु बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा बंधाऱ्यांचे काम पद्धतशीर व्हावे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

बंधाऱ्याच्या लोखंड प्लेट चोरी- बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या प्लेट चोरीला गेल्याने नदीचे पाणी अडून न राहता वाहून जाते. अनेक बंधाऱ्यांच्या प्लेट चोरीला गेल्याने  या बंधाऱ्यांमध्ये एकही वर्षी पाणी साठून राहत नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खिंड पडली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करून तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे. बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प