शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तयार होणार २०० शेतकरी गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:25 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देदुप्पट उत्पन्नासाठी मिळेल चालना : उत्कृष्ट शेतकरी गटांना देणार पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी या गटांना शासन कृषीसाठी वापरात येणारे यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध कृषी विषयक कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हा प्रशासनाने निर्विष्ठा, प्रशिक्षण, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी माल प्रक्रिया व पणन यावर जनजागृती करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी सामूहिक शेती, आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजन शेतकरी गटांमार्फत प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकाच शिवारातील भौगोलिक क्षेत्रामध्ये संलग्न शेती असणाऱ्या किमान २० शेतकऱ्यांचा १०० एकर क्षेत्र असलेल्या समूहाला नियोजनबद्धरित्या शेती करणे, शेतीमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे व त्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे, एकत्रितपणे शेती करण्यासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे व यांत्रिकीकरणाद्वारे एकत्रित शेती करण्याचे काम गट शेतीतून होणार आहे. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे ५० गट आहेत. परंतु आता २०० गट तयार होणार आहेत.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास किमान एक समूह असेल. नक्षलग्रस्त तालुका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या आराखड्यात लागणारा निधी, बँकीग प्रणालीच्या माध्यमातून मिळणार असल्याबाबत करार केला जाईल. घाऊक विपणन कंपन्यांसोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्य साखळी बाबतचा करार केला असेल अशा शेतकरी उत्पादक गटाला याचा लाभ होणार आहे. समूहातील शेतकऱ्यांची संख्या २० व शेती क्षेत्र १०० एकर असेल. ज्या ठिकाणी संरक्षित भाजीपाला, संरक्षित फुल पिके यासाठी पॉलीहाऊस शेडनेटचे माध्यमातून समूह निर्माण होत असल्यास अशा ठिकाणी किमान क्षेत्र मर्यादा २५ एकर एका अपगटासाठी राहील. या शेती गटाचे उत्पादन वाढविण्यासाठी १ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.सहकार्याची भावना निर्माण करणेसमूहशेती प्रकल्पामध्ये शेती उत्पादन पध्दती, विपणनाचे नियोजन, अंमलबजावणी सामूहिकरीतीने करणे महत्वाचे आहे. या दृष्टीकोनातून सामूहिक संघ भावना निर्माण करण्यासाठी प्रकल्प कालावधीत किमान मंडळ कृषी अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.उत्कृष्ट गटांना मिळणार पुरस्कारउत्कृष्ट कामगिरी केलेल्या ३ गटांना राज्यस्तरावर पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी गट, समूह, शेतकरी कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.