शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिल्ह्यात तयार होणार २०० शेतकरी गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:25 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देदुप्पट उत्पन्नासाठी मिळेल चालना : उत्कृष्ट शेतकरी गटांना देणार पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी या गटांना शासन कृषीसाठी वापरात येणारे यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध कृषी विषयक कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हा प्रशासनाने निर्विष्ठा, प्रशिक्षण, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी माल प्रक्रिया व पणन यावर जनजागृती करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी सामूहिक शेती, आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजन शेतकरी गटांमार्फत प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकाच शिवारातील भौगोलिक क्षेत्रामध्ये संलग्न शेती असणाऱ्या किमान २० शेतकऱ्यांचा १०० एकर क्षेत्र असलेल्या समूहाला नियोजनबद्धरित्या शेती करणे, शेतीमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे व त्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे, एकत्रितपणे शेती करण्यासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे व यांत्रिकीकरणाद्वारे एकत्रित शेती करण्याचे काम गट शेतीतून होणार आहे. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे ५० गट आहेत. परंतु आता २०० गट तयार होणार आहेत.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास किमान एक समूह असेल. नक्षलग्रस्त तालुका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या आराखड्यात लागणारा निधी, बँकीग प्रणालीच्या माध्यमातून मिळणार असल्याबाबत करार केला जाईल. घाऊक विपणन कंपन्यांसोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्य साखळी बाबतचा करार केला असेल अशा शेतकरी उत्पादक गटाला याचा लाभ होणार आहे. समूहातील शेतकऱ्यांची संख्या २० व शेती क्षेत्र १०० एकर असेल. ज्या ठिकाणी संरक्षित भाजीपाला, संरक्षित फुल पिके यासाठी पॉलीहाऊस शेडनेटचे माध्यमातून समूह निर्माण होत असल्यास अशा ठिकाणी किमान क्षेत्र मर्यादा २५ एकर एका अपगटासाठी राहील. या शेती गटाचे उत्पादन वाढविण्यासाठी १ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.सहकार्याची भावना निर्माण करणेसमूहशेती प्रकल्पामध्ये शेती उत्पादन पध्दती, विपणनाचे नियोजन, अंमलबजावणी सामूहिकरीतीने करणे महत्वाचे आहे. या दृष्टीकोनातून सामूहिक संघ भावना निर्माण करण्यासाठी प्रकल्प कालावधीत किमान मंडळ कृषी अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.उत्कृष्ट गटांना मिळणार पुरस्कारउत्कृष्ट कामगिरी केलेल्या ३ गटांना राज्यस्तरावर पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी गट, समूह, शेतकरी कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.