शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून प्रक्रिया सुरूच : यंत्रणाही त्रस्त : शेतकरी पायऱ्या झिजविण्यात व्यस्त

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तत्कालीन भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील २० हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांनी बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट सुरू आहे.शासनाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. पडताळणीनंतर यापैकी ८३ हजार ५४३ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.आत्तापर्यंत बँका, सहकार निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण ३२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार ६३ हजार १५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ११८ कोटी रुपये कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले आहे.यात जिल्हा बँकेकडे ५२ हजार ६८८ शेतकरी सभासद, ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८१४ आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण ८३ हजार शेतकऱ्यांपैकी अद्यापही २० हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम झाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर कर्जाच्या रक्कमेवरील व्याज देखील भरावे लागत आहे.कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.दोन वर्षांपासून पीक कर्जाला मुकलेजे शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांचे कर्ज निश्चित माफ होणार होते. त्यामुळेच या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही २० हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर दुसरीकडे त्यांना व्याजाचा भूर्दंड देखील सहन करावा लागत आहे.चूक शासनाची शिक्षा शेतकऱ्यांनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तत्कालीन भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमार्फी जाहीर करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पात्र संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय कर्जमाफीसाठी बँकांच्या पायºया झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे चूक शासनाची आणि शिक्षा शेतकऱ्यांना असेच चित्र आहे.जुने संपेना नव्याची घाईछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या २० हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. हीच प्रक्रिया पूर्ण करण्यात यंत्रणा व्यस्त आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सुध्दा शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिले आहे. त्याच दृष्टीने विभागीय आयुक्तांनी सहकार निबंधक कार्यालयाला कर्जधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जुने संपेना आणि नव्याची घाई असे चित्र आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज