शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून प्रक्रिया सुरूच : यंत्रणाही त्रस्त : शेतकरी पायऱ्या झिजविण्यात व्यस्त

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तत्कालीन भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील २० हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांनी बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट सुरू आहे.शासनाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. पडताळणीनंतर यापैकी ८३ हजार ५४३ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.आत्तापर्यंत बँका, सहकार निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण ३२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार ६३ हजार १५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ११८ कोटी रुपये कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले आहे.यात जिल्हा बँकेकडे ५२ हजार ६८८ शेतकरी सभासद, ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८१४ आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण ८३ हजार शेतकऱ्यांपैकी अद्यापही २० हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम झाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर कर्जाच्या रक्कमेवरील व्याज देखील भरावे लागत आहे.कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.दोन वर्षांपासून पीक कर्जाला मुकलेजे शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांचे कर्ज निश्चित माफ होणार होते. त्यामुळेच या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही २० हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर दुसरीकडे त्यांना व्याजाचा भूर्दंड देखील सहन करावा लागत आहे.चूक शासनाची शिक्षा शेतकऱ्यांनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तत्कालीन भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमार्फी जाहीर करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पात्र संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय कर्जमाफीसाठी बँकांच्या पायºया झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे चूक शासनाची आणि शिक्षा शेतकऱ्यांना असेच चित्र आहे.जुने संपेना नव्याची घाईछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या २० हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. हीच प्रक्रिया पूर्ण करण्यात यंत्रणा व्यस्त आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सुध्दा शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिले आहे. त्याच दृष्टीने विभागीय आयुक्तांनी सहकार निबंधक कार्यालयाला कर्जधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जुने संपेना आणि नव्याची घाई असे चित्र आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज