शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे६६३ गावे व वाड्यांना सुविधा : ४.४८ कोटींची विशेष तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तिसºया टप्यात एकूण ६६३ गावे व वाड्यांसाठी १९१६ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, नवीन विंधन विहिरी, विहीरींची विशेष दुरुस्ती व विहिरींचे खोलीकरण, तात्पुरती पुरक नळयोजना याप्रमाणे एप्रिल ते जून या कालवधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत बºयाच पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. त्यातच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जावे यासाठी गावात विहिरी, हातपंप व काही खाजगी विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे.यावर्षी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कशाप्रकारे मार्गी लावता येईल या दृष्टीने यंदा १९१६ उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील एकूण १११ गावे व वाड्यांमध्ये १३३ उपाययोजना, गोरेगाव तालुक्यातील १७८ गावे-वाड्यांमध्ये ३७४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ गावे-वाड्यांमध्ये १९८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९४ गावे- वाड्यांमध्ये ३०३, तिरोडा तालुक्यातील ९५ गावे-वाड्यांमध्ये २६०, सालेकसा तालुक्यातील ४९ गावे- वाड्यांसाठी ४१०, देवरी तालुक्यातील २९ गावे-वाड्यांमध्ये ९८ तर आमगाव तालुक्यातील ५२ गावे-वाड्यांमध्ये १४० उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.४.४८ कोटींची तरतूदप्रत्येक तालुक्यात करण्यात येणाºया उपाययोजनांनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यासाठी २५ लक्ष ४० हजार, गोरेगाव ७५ लक्ष ८५ हजार, सडक-अर्जुनी ५९ लक्ष ९० हजार, अर्जुनी-मोरगाव ४२ लक्ष, तिरोडा एक कोटी ५५ लक्ष, सालेकसा ८८ लक्ष ३६ हजार, देवरी ११ लक्ष २० हजार व आमगाव तालुक्यासाठी ४५ लक्ष ९५ हजार अशाप्रकारे चार कोटी ४८ लक्ष ४१ हजार रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात