शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे६६३ गावे व वाड्यांना सुविधा : ४.४८ कोटींची विशेष तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तिसºया टप्यात एकूण ६६३ गावे व वाड्यांसाठी १९१६ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, नवीन विंधन विहिरी, विहीरींची विशेष दुरुस्ती व विहिरींचे खोलीकरण, तात्पुरती पुरक नळयोजना याप्रमाणे एप्रिल ते जून या कालवधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत बºयाच पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. त्यातच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जावे यासाठी गावात विहिरी, हातपंप व काही खाजगी विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे.यावर्षी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कशाप्रकारे मार्गी लावता येईल या दृष्टीने यंदा १९१६ उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील एकूण १११ गावे व वाड्यांमध्ये १३३ उपाययोजना, गोरेगाव तालुक्यातील १७८ गावे-वाड्यांमध्ये ३७४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ गावे-वाड्यांमध्ये १९८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९४ गावे- वाड्यांमध्ये ३०३, तिरोडा तालुक्यातील ९५ गावे-वाड्यांमध्ये २६०, सालेकसा तालुक्यातील ४९ गावे- वाड्यांसाठी ४१०, देवरी तालुक्यातील २९ गावे-वाड्यांमध्ये ९८ तर आमगाव तालुक्यातील ५२ गावे-वाड्यांमध्ये १४० उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.४.४८ कोटींची तरतूदप्रत्येक तालुक्यात करण्यात येणाºया उपाययोजनांनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यासाठी २५ लक्ष ४० हजार, गोरेगाव ७५ लक्ष ८५ हजार, सडक-अर्जुनी ५९ लक्ष ९० हजार, अर्जुनी-मोरगाव ४२ लक्ष, तिरोडा एक कोटी ५५ लक्ष, सालेकसा ८८ लक्ष ३६ हजार, देवरी ११ लक्ष २० हजार व आमगाव तालुक्यासाठी ४५ लक्ष ९५ हजार अशाप्रकारे चार कोटी ४८ लक्ष ४१ हजार रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात