शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे६६३ गावे व वाड्यांना सुविधा : ४.४८ कोटींची विशेष तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तिसºया टप्यात एकूण ६६३ गावे व वाड्यांसाठी १९१६ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, नवीन विंधन विहिरी, विहीरींची विशेष दुरुस्ती व विहिरींचे खोलीकरण, तात्पुरती पुरक नळयोजना याप्रमाणे एप्रिल ते जून या कालवधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत बºयाच पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. त्यातच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जावे यासाठी गावात विहिरी, हातपंप व काही खाजगी विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे.यावर्षी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कशाप्रकारे मार्गी लावता येईल या दृष्टीने यंदा १९१६ उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील एकूण १११ गावे व वाड्यांमध्ये १३३ उपाययोजना, गोरेगाव तालुक्यातील १७८ गावे-वाड्यांमध्ये ३७४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ गावे-वाड्यांमध्ये १९८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९४ गावे- वाड्यांमध्ये ३०३, तिरोडा तालुक्यातील ९५ गावे-वाड्यांमध्ये २६०, सालेकसा तालुक्यातील ४९ गावे- वाड्यांसाठी ४१०, देवरी तालुक्यातील २९ गावे-वाड्यांमध्ये ९८ तर आमगाव तालुक्यातील ५२ गावे-वाड्यांमध्ये १४० उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.४.४८ कोटींची तरतूदप्रत्येक तालुक्यात करण्यात येणाºया उपाययोजनांनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यासाठी २५ लक्ष ४० हजार, गोरेगाव ७५ लक्ष ८५ हजार, सडक-अर्जुनी ५९ लक्ष ९० हजार, अर्जुनी-मोरगाव ४२ लक्ष, तिरोडा एक कोटी ५५ लक्ष, सालेकसा ८८ लक्ष ३६ हजार, देवरी ११ लक्ष २० हजार व आमगाव तालुक्यासाठी ४५ लक्ष ९५ हजार अशाप्रकारे चार कोटी ४८ लक्ष ४१ हजार रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात