शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

१९ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 26, 2017 00:53 IST

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या

 सहषराम कोरोटे : घोनाडी क्षेत्रात लिफ्ट इरिगेशन व बँक शाखेची त्वरित व्यवस्था करा देवरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन माळी समाज स्वत:च्या परिश्रमाच्या भरवश्यावर व्यवसायीक शेती व लहानसहान गृहउद्योग करुन आपला परिवार आणि समाजाला पुढे नेण्याचे काम करीत आहे. एक नवीन ओळख निर्माण करण्याचे काम माळी समाज करीत आहे. परंतु घोनाडी क्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे. अनेक वर्षापासून या भागात एक लिफ्ट इरीगेशनची आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरिता बँक शाखेची येथील लोकांची मागणी आहे. या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन येथील लोकप्रतिनिधींनी त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. कोरोटे हे घोनाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्थेद्वारे रविवार (ता.२३) आयोजित १९ वर-वधू जोडप्यांच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. दीप प्रज्वलन करून उद्घाटन आमदार संजय पुराम यांनी केले. अध्यक्षस्थानी विदर्भ माळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोरे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, एपीओ कॅम्प बोंडेचे पोलीस निरीक्षक काळे, देवरीचे बँक व्यवस्थापक सोभा गुरनुले, तालुका भाजपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, घोनाडीचे सरपंच शालीकराम गुरनुले, पोलीस पाटील दयाराम पंधरे, पालांदूर (जमी) चे तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर निकोडे, माजी सभापती कामेश्वर निकोडे, सिंगनडोहचे मनोहर मिरी, माळी समाजाचे तालुकाध्यक्ष यशवंत गुरनुले यांच्यासह माळी समाजातील गावागावातून शेकडोच्या संख्येत महिला, पुरूष व युवक मंडळी उपस्थित राहून या विवाह सोहळ्यातील १९ नवजोडप्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा देऊन आपले आशीर्वाद दिले. कोरोटे पुढे म्हणाले, देवरी तालुक्यातील दुर्गम भाग घोनाडी या क्षेत्रात मोठ्या संख्येत माळी समाज राहतो आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. आपल्या शेतातून पारंपरिक पद्धतीने शेती उद्योगाचे काम करतो. परंतु नैसर्गिक दुष्काळात सिंचनाअभावी या समाजाला खूप हालअपेष्टा सहन करावे लागते. अशा परिस्थितीत शासनाकडून कसलीही आर्थिक मदत नाही आणि सिंचनाकरिता पाण्याची सोय नाही, अशा दुहेरी समस्येत या भागातील शेतकरी व शेतमजूर आपले जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे या भागात दैनंदिन देवाणघेवाणचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपले कामधंदे सोडून चिचगड किंवा देवरीला जावे लागते. अद्याप या भागात कोणात्याही बँकेने आपली शाखा उघडलेली नाही. या दोन्ही समस्येबाबद अनेक वर्षापासून येथील लोक अनेक वर्तमानपत्र व शासनकर्त्यांना निवेदनातून कळविण्यात आले. तरी सुद्धा या गंभीर मुद्याकडे कोणात्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप लक्ष दिलेले नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. शासनकर्त्यांनी या भागात एक लिफ्ट इरीगेशन व बँक शाखेचे शुभारंभ त्वरित करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. प्रास्ताविक सुदाम मोहुर्ले यांनी मांडले. संचालन झाशीनगरचे समाज अध्यक्ष डॉ. यशवंत गुरनुले यांनी केले. आभार घोनाडी समाजाचे उपाध्यक्ष विनोबा लेंडे यांनी मानले.(प्रतिनिधी)