शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीईच्या तिसऱ्या फेरीत १८३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:06 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्दे१०२९ जागांसाठी २११२ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज : प्रवेश घेण्याची मुदत २० जूनपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्के अंतर्गत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी २ हजार ११२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर तिसºया सोडतीत १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित नामांकित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सत्र २०१८-१९ मध्ये आॅनलाईन पध्दतीने राबविली जात आहे. १३७ शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरीता शाळांची नोंदणी केली आहे. १३७ शाळांमधील १०२९ जागेकरीता २ हजार ११२ पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे.सदर प्रक्रियेचा पहिला ड्रा (लॉटरी) १२ मार्च रोजी झाला. त्यानंतर पुन्हा १९ एप्रिलला ही सोडत झाली. दोन्ही सोडतीत १००६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील ८२४ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.तिसरी सोडत १२ जूनला काढण्यात आली. यात १८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांची नावे २० जूनपर्यंत दिलेल्या शाळेत दाखल करायची आहेत. यासाठी पालकांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले संदेश मिटवू नये. पालकांनी शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे.सबळ कारणांशिवाय प्रवेश नाकारता येणार नाहीकोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणारी शाळा कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाल्याचे वय (विद्यार्थ्याचे) कमीत कमी ५ वर्ष ८ महिने पूर्ण असावे, ६ वर्ष ११ महिने २९ दिवस पेक्षा अधिक असू नये.

टॅग्स :educationशैक्षणिक