शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१७१८ कुटुंबात फुकटात पाणी

By admin | Updated: November 15, 2015 01:16 IST

वीजेच्या मीटरमध्ये थोडी गडबड केली किंवा थेट तारांवरून वीज चोरी केली तर कारवाई होण्यास वेळ लागत नाही.

कोट्यवधीची थकबाकी : मीटरशिवाय नळाचे कनेक्शनविकास बोरकर गोंदियावीजेच्या मीटरमध्ये थोडी गडबड केली किंवा थेट तारांवरून वीज चोरी केली तर कारवाई होण्यास वेळ लागत नाही. मात्र पाण्यासारख्या मौल्यवान झालेल्या वस्तूची गोंदियात सर्रास चोरी होत आहे. गोंदिया शहरात १७१८ जण आतापर्यंत अशा पद्धतीने मीटरशिवाय पाणी वापरत असल्याचे आढळले आहेत. खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडूनच हा आकडा उपलब्ध झाला आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांचे पाणी हे लोक फुकटात वापरत असल्यामुळे जीवन प्राधीकरण विभाग अडचणीत आला आहे.या फुकट पाणी वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी जीवन प्राधीकरणकडे सध्यातरी कोणतीही उपाययोजना किंवा यंत्रणा नाही. गोंदिया शहरात जवळपास ५०० नळ कनेक्शन बिना मीटरने सुरू आहेत असे गृहित धरले जात होते. मात्र आता जी माहिती समोर आली त्यामुळे जीवन प्राधीकरण विभागाला चांगलाच धक्का बसला आहे. अशा प्रकारे बिना मीटरने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढण्याची कारण म्हणजे त्या लोकांकडे असलेली जुन्या बिलाची थकबाकी. ज्या लोकांनी एकदा अधिकृतपणे नळ कनेक्शन घेतले, पण बिल भरले नसल्यामुळे ते कनेक्शन कापण्यात आले. पण त्यांनी स्वत:च प्लंबरच्या मदतीने पुन्हा थेट पाईपलाईनवरून कनेक्शन जोडून घेतले. या कामात थोडे पैसे खर्च करावे लागत असले तरी नंतर मीटरअभावी बिलच येत नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी ही शक्कल लढविली आहे. यातूनच आतापर्यंत गोंदिया शहरात १७१८ कुटुंबात अशा पद्धतीने पाण्याची चोरी सुरू असल्याचे दिसून आले.कोण करणार खर्च आणि कारवाई?वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटर काढून नेतात, पण पाणी चोरी रोखण्यासाठी नळाचे कनेक्शन कापताना जमीन खोदावी लागते. त्यासाठी खर्च येतो. मजीप्रा जवळ या कामासाठी स्वत:चे कर्मचारी तर नाहीच पण भाड्याने मजूर लावण्याचीही सोय नाही. अशा परिस्थितीत हा खर्च करणार कोण? हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा खर्च करून पाण्याचे कनेक्शन कापले तरी प्लंबरच्या मदतीने पुन्हा ते कनेक्शन जोडले जाणार नाही याची शाश्वती नसते. आपल्या घरासमोरील पाईपलाईन खोदून अवैधपणे नळ कनेक्शन लावणे खूप कठीण नसल्यामुळे नळ कनेक्शन कापण्यासाठीचा खर्च करायचा का? हा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणसमोर मोठा यक्षप्रश्न आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी राजकीय दबावातून अशी कारवाई कोणावर करण्याची हिंमत मजीप्राचे अधिकारी करणार नाहीत.