शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

१६५ गावे होणार ‘जलयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:55 PM

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : गाव आराखडे बनविण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ साठी जिल्हास्तरीय कमिटीकडून १६५ गावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप गावांचे आराखडे बनविणे व गावस्तरावर ग्रामसभांमध्ये मंजुरी घेण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. तरी १६५ गावे जलयुक्त होणार, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.यात गोंदिया तालुक्यातील आंभोरा, वडेगाव, चारगाव, छिपिया, इर्री, जिरूटोला, कामठा, कटंगटोला, खातिया, कोरणी, मोरवाही, मुंडीपार खु., पांजरा, परसवाडा, रजेगाव, सातोना, सावरी, सरकारटोला, शिरपूर, झिलमिली, आसोली, रतनारा, बनाथर, बरबसपुरा, बटाना, भादुटोला, चिरामणटोला, जगनटोला, कोचेवाही, लंबाटोला, मरारटोला, मोगर्रा व मुरपार अशा सर्वाधिक ३४ गावांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी, ईसाटोला, तुमखेडा बु., बोळूंदा, कुºहाडी, गणखैरा, धानुटोला, बोरगाव, रामाटोला, खाडीपार, सर्वाटोला, पिंडकेपार, बबई, तुमसर, तेढा, पालेवाडा, म्हसगाव, कवडीटोला, हिराटोला व पलखेडा या २० गावांचा समावेश आहे. तर तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, खेडेपार, कुल्पा, लेदडा, मनोरा, मुरपार, नांदलपार, निलागोंदी, सिल्ली, सोनेखारी, सितेपार, बोदा, किंडगीपार, सावरा, बिहिरिया, भुराटोला, मुंडीकोटा, सरांडी, खुरखुडी व डोंगरगाव या २० गावांचा समावेश आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका, देऊळगाव, चापटी, इंजोरा, कोहालगाव, सोमलपूर, भुरसीटोला, पांढरवानी-रै, सुकडी, निलज, चान्ना, अरततोंडी, धाबेटेकडी-आदर्श, सिरेगावबांध, चुटिया व संजयनगर अशा १६ गावांचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात मंजूर झालेल्या १५ गावांमध्ये रामजीटोला, वाघडोंगरी, रामाटोला, धावडीटोला, धोबीटोला, मक्कीटोला, तिगाव, आसोली, बोथली, ठाणाटोला, बुराडीटोला, शिवणटोला, मोहगाव, सोनेखारी व वडद गावाचा समावेश आहे. तसेच देवरी तालुक्याच्या मंजूर २७ गावांमध्ये मुरमाडी, चिपोटा, सुकडी, रोपा, पिपरखारी, वडेकसा, शिरपूरबांध, टोयागोंदी, हळदी, पावरटोला, धानोरी, बोंडे, पळसगाव, रेहडी, भागी, निलज, म्हल्हारबोडी, चिचेवाडा, सिंदीबिरी, सालई, पांढरवानी, डवकी, पिंडकेपार-देवरी, पिंडकेपार-चि, सुरतोली, मुल्ला व देवाटोला गावांचा समावेश आहे.तसेच सालेकसा तालुक्यातील बिजेपार, ब्राह्मणी, डोमाटोला, हल्बीटोला, खेडेपार, कोटरा, कुंभारटोला, लभानधारणी, लटोरी, नवेगाव, लोहारा, पांढरी, पाणगाव, पाऊलदौना, सोनपुरी, तिरखेडी, मरकाखांदा, मराबजोब व पठानटोला अशी १९ गावे तर सडक-अर्जुनी तालुक्यातील सितेपार, दोडके-जांभळी, कोकणा-जमि., खोबा-चिंगी, कोहळीटोला-चिखली, मोहघाट, धानोरी, दल्ली, सालेधारणी, चिरचाडी, राजगुडा, खडकी, कोसमघाट व खजरी अशा १४ गावांचा समावेश आहे.अशी एकूण १६५ गावे यावर्षी जलयुक्त शिवार अभियानातून जलयुक्त करण्यात येणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गावांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहेत.जिल्ह्यातील ५८२ कामे अपूर्णचमागील वर्षी सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या विविध विभागांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या ६३ गावांमध्ये एकूण १९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्या सर्वांना प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी ७१८६.४४ लाख रूपयांची तरतूद होती. यापैकी १९४८ कामांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले होते. त्यातही १९१२ कामे सुरू करण्यात आली होती. यात २९ गावांमध्ये १३३० कामे १०० टक्के पूर्ण करण्यात आली. तर ५८२ कामे अपूर्णच असून त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार