शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील १६ गावे होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:09 IST

वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होणार मदत : जलयुक्त शिवार अभियान ठरतेय वरदान

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संरक्षित पाणी साठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर दिवसरात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली जीवन जगत आहे. शेतकºयांना पीक उत्पादन दुप्पटीने वाढावे म्हणून भुजल पातळीत वाढ करुन सरंक्षीत जलसिंचनात वाढ करण्याच्या दृष्टीने सन २०१५-१६ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. या अभियानात अर्जुनी मोरगाव तालुक्यात २०१८-१९ मध्ये १६ गावात पाण्याच्या सरंक्षित सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या तालुकास्तरीय समितीने देऊळगाव (बोदरा) अरततोंडी, तिडका (करडगाव), धाबेटेकडी, चापटी, सुकळी (खैरी), चान्ना (बाक्टी), भुरशीटोला, सिरेगाव, कोहलगाव, पांढरवाणी (रैय्यत), निलज, इंजोरी, चुटिया (पळसगाव), संजयनगर, सोमलपूर या १६ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्यात पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये ४ गावांची निवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, २०१७-१८ मध्ये ७ गावे, २०१८-१९ मध्ये १६ गावांची निवड करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याच्या संचित साठ्यामध्ये वाढ होते. गावातील पशुधनाला पिण्यासाठी तसेच शेतीचा संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकºयांना विविध पिके घेता येणार.विविध यंत्रणेची कामेजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांमध्ये जलसाठा वाढवून पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी जलसंधारण विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वनविभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गंत जलसंधारणाची विविध कामे करण्यात येणार आहेत.तालुकास्तरीय समितीजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या तालुक्यातील १६ गावातील विविध विकासात्मक आराखडे बनवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या नियंत्रणाखाली समिती कार्यरत राहणार आहे. यामध्ये तहसीलदार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, उपविभागीय अभियंता, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांचा समावेश आहे. ही समिती तालुक्याचा आराखडा मंजूर करुन, वेळोवेळी कामाचा आढावा घेणार आहेत.ही कामे होणारजलयुक्त शिवार अभियानातील गावामध्ये पाण्याचा ताळेबंद तयार करुन गावात आवश्यक असलेले पिण्याचे पाणी, जनावरांसाठी, शेतीसाठी व पडणारा पाऊस याचा पाण्याचा ताळेबंद तयार करुन रब्बी, खरीप व उन्हाळी पिकांसाठी लागणारे सरंक्षीत, ओलीतासाठी लागणारे पाणी याचा ताळेबंद केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये भातखाचरे, दुरुस्ती, बोळी- तलाव दुरुस्ती, सिमेंट नाला बंधारा बांधणे, जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, माती नाला बंधाºयामधील गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामांना प्राथमिकता दिली जाणार आहे.आराखडे तयारनिवड झालेल्या गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु झाले आहे. प्रस्तावित केलेल्या कामाच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेवून सदर कामाचे निविदा काढल्या जाणार आहेत. शेतीचा हंगाम संपल्यानंतर निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध कामे सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDamधरण