शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

१५६ गावात ‘वाय-फाय’ चावळी

By admin | Updated: May 25, 2017 00:46 IST

गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही.

गोंदिया व गोरेगाव तालुक्याचा समावेश : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून गोंदियाची निवडनरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना आॅनलाईन इतर माहिती मिळू शकत नाही. अश्या गावांना आता कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक गावात टॉवर लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील १५६ गावांची निवड करण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्स सोसायटीच्या माध्यमातून ‘वायफाय चावळी’ योजना सुुरूवात करण्यात आली.या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आॅनलाईनची सेवा मिळणार आहे. गावात ५०० मीटरच्या अंतरात वाय-फायची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना संबधीत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड जनरेट करावे लागेल. यानंतर स्वमर्जीच्या प्लाननुसार फोर जी च्या स्पीड ने इंटरनेट वापरता येईल.ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या विद्युतची आहे. या समस्याच्या निराकरणासाठी सोलर पॉवरच्या वैकल्पीक पध्दतीवर विचार करण्यात येत आहे. गावात प्रभावीपणे वाय-फाय झोन तयार केला जाणार आहे. गावातील सर्व प्रमुख परिसराला कव्हर केले जाईल. स्मार्ट फोन, टेबलेट्स व होम डिवाइस यूजर्स संबंधित विभागाची वेबसाइटला लिंक करून याचा फायदा घेण्यात यईल. या टेस्ट व्हॅल्यू एडेड सर्विसेस च्या माध्यमातून शिक्षण साहित्य वितरीत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषी संबधी माहिती होईल. छोटे व्यावसायीकांसाठी या वाय-फाय सेवेचा वापर केला जाणार आहे. याचा उद्देश पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, डाकघर, ग्राम पंचायत कार्यालय, विद्यालय येथेही कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. गावांत शासकीय व खासगी एजेंसींना वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्यात येईल. घरी बसून विद्युत बील,आॅनलाईन अर्ज, कृषी संबधी माहिती, विविध योजनांच्या माहिती व्यतिरिक्त आॅनलाईन परतफेड व इतर माहिती सहजरित्या आता उपलब्ध होणार आहे. सहा तालुके ६ महिन्यांच्या प्रतीक्षेतवाय-फाय चावळीच्या पहिल्या टप्यात जिल्ह्याच्या ५५१ ग्राम पंचायतींपैकी गोंदिया तालुक्यातील १०२ ग्राम पंचायती तर गोरेगाव तालुक्याच्या ५४ ग्राम पंचायतींमध्ये याच आठवड्यात काम सुरू होणार आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक गावांचे सर्वेक्षण झाले आहे. ३० पेक्षा अधिक ग्राम पंचायत मध्ये साहित्य टाकण्यात आले. भारत ब्रॉडबैंड निगम लि. (बीबीएनल) व सीएससी यांची संयुक्त सेवा येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील उर्वरीत सहा तालुक्यात वाय-फाय चावळीची सुरूवात करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या या योजनेंतर्गत महाराष्टाच्या गोंदिया जिल्ह्याची पहिल्या टप्यात निवड झाली. गोरेगाव व गोंदिया या दोन तालुक्यातील १५६ ग्राम पंचायतींना वाय-फाय चावळीने जोडण्याचे लक्ष आहे.राकेश बघेलेजिल्हा व्यवस्थापक, सीएससी (कॉमन सर्विस सेंटर), गोंदिया.