शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

१५६ गावात ‘वाय-फाय’ चावळी

By admin | Updated: May 25, 2017 00:46 IST

गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही.

गोंदिया व गोरेगाव तालुक्याचा समावेश : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून गोंदियाची निवडनरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावात इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाइल नेटवर्कराहात नसल्याने नागरिकांना त्रास होतो. ग्रामीणांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना आॅनलाईन इतर माहिती मिळू शकत नाही. अश्या गावांना आता कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक गावात टॉवर लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील १५६ गावांची निवड करण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्स सोसायटीच्या माध्यमातून ‘वायफाय चावळी’ योजना सुुरूवात करण्यात आली.या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आॅनलाईनची सेवा मिळणार आहे. गावात ५०० मीटरच्या अंतरात वाय-फायची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना संबधीत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड जनरेट करावे लागेल. यानंतर स्वमर्जीच्या प्लाननुसार फोर जी च्या स्पीड ने इंटरनेट वापरता येईल.ग्रामीण भागात सर्वात मोठी समस्या विद्युतची आहे. या समस्याच्या निराकरणासाठी सोलर पॉवरच्या वैकल्पीक पध्दतीवर विचार करण्यात येत आहे. गावात प्रभावीपणे वाय-फाय झोन तयार केला जाणार आहे. गावातील सर्व प्रमुख परिसराला कव्हर केले जाईल. स्मार्ट फोन, टेबलेट्स व होम डिवाइस यूजर्स संबंधित विभागाची वेबसाइटला लिंक करून याचा फायदा घेण्यात यईल. या टेस्ट व्हॅल्यू एडेड सर्विसेस च्या माध्यमातून शिक्षण साहित्य वितरीत केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषी संबधी माहिती होईल. छोटे व्यावसायीकांसाठी या वाय-फाय सेवेचा वापर केला जाणार आहे. याचा उद्देश पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, डाकघर, ग्राम पंचायत कार्यालय, विद्यालय येथेही कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. गावांत शासकीय व खासगी एजेंसींना वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टीव्हिटी देण्यात येईल. घरी बसून विद्युत बील,आॅनलाईन अर्ज, कृषी संबधी माहिती, विविध योजनांच्या माहिती व्यतिरिक्त आॅनलाईन परतफेड व इतर माहिती सहजरित्या आता उपलब्ध होणार आहे. सहा तालुके ६ महिन्यांच्या प्रतीक्षेतवाय-फाय चावळीच्या पहिल्या टप्यात जिल्ह्याच्या ५५१ ग्राम पंचायतींपैकी गोंदिया तालुक्यातील १०२ ग्राम पंचायती तर गोरेगाव तालुक्याच्या ५४ ग्राम पंचायतींमध्ये याच आठवड्यात काम सुरू होणार आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक गावांचे सर्वेक्षण झाले आहे. ३० पेक्षा अधिक ग्राम पंचायत मध्ये साहित्य टाकण्यात आले. भारत ब्रॉडबैंड निगम लि. (बीबीएनल) व सीएससी यांची संयुक्त सेवा येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील उर्वरीत सहा तालुक्यात वाय-फाय चावळीची सुरूवात करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या या योजनेंतर्गत महाराष्टाच्या गोंदिया जिल्ह्याची पहिल्या टप्यात निवड झाली. गोरेगाव व गोंदिया या दोन तालुक्यातील १५६ ग्राम पंचायतींना वाय-फाय चावळीने जोडण्याचे लक्ष आहे.राकेश बघेलेजिल्हा व्यवस्थापक, सीएससी (कॉमन सर्विस सेंटर), गोंदिया.