शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

जिल्ह्यात यावर्षी १.५ लाख वृक्ष लागवड

By admin | Updated: July 31, 2015 02:01 IST

वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते.

गोंदिया : वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र यापैकी किती वृक्ष जगतात व किती मरतात, हा शोधाचा विषय ठरत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रोपटे जगतात, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे हे लागवड झालेल्या गावांनाच ठाऊक!यंदा सामाजिक वनीकरण विभागाला एक लाख नऊ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी एक लाख पाच हजार ७०० वृक्षांची लागवड पूर्ण झालेली असून काम सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. एक रोपटे लावण्यासाठी जवळपास ४५० रूपयांचे खर्च येते. यात रोपटे, पिंजरे, खड्डे व पाणी देणे या बाबींचा समावेश असतो. मात्र खरे काम वृक्ष लागवडीनंतर त्याचे संरक्षण व संवर्धनाचे असते. याकडे किती लक्ष दिले जाते, हासुद्धा शोधाचाच विषय.दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये एकूण ७७ हजार ६८२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७६ हजार ५०२ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९८ आहे. सन २०१३ मध्ये ८५ हजार ९०३ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार ९८५ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ आहे. तर सन २०१४ मध्ये ७३ हजार ४६८ वृक्षांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली होती. यापैकी ६८ हजार ४३८ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ असल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तेवढी जागा उपलब्ध असते का? याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला त्याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट कागदावर साध्य होते की खरोखर कृत्यातून होते, यावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)