शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
4
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
5
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
6
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
7
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
8
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
9
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
10
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
11
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
12
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
13
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
14
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
15
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
16
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
17
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
18
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
19
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
20
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता

जिल्ह्यात यावर्षी १.५ लाख वृक्ष लागवड

By admin | Updated: July 31, 2015 02:01 IST

वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते.

गोंदिया : वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र यापैकी किती वृक्ष जगतात व किती मरतात, हा शोधाचा विषय ठरत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रोपटे जगतात, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे हे लागवड झालेल्या गावांनाच ठाऊक!यंदा सामाजिक वनीकरण विभागाला एक लाख नऊ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी एक लाख पाच हजार ७०० वृक्षांची लागवड पूर्ण झालेली असून काम सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. एक रोपटे लावण्यासाठी जवळपास ४५० रूपयांचे खर्च येते. यात रोपटे, पिंजरे, खड्डे व पाणी देणे या बाबींचा समावेश असतो. मात्र खरे काम वृक्ष लागवडीनंतर त्याचे संरक्षण व संवर्धनाचे असते. याकडे किती लक्ष दिले जाते, हासुद्धा शोधाचाच विषय.दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये एकूण ७७ हजार ६८२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७६ हजार ५०२ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९८ आहे. सन २०१३ मध्ये ८५ हजार ९०३ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार ९८५ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ आहे. तर सन २०१४ मध्ये ७३ हजार ४६८ वृक्षांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली होती. यापैकी ६८ हजार ४३८ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ असल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तेवढी जागा उपलब्ध असते का? याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला त्याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट कागदावर साध्य होते की खरोखर कृत्यातून होते, यावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)