शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

जिल्ह्यात यावर्षी १.५ लाख वृक्ष लागवड

By admin | Updated: July 31, 2015 02:01 IST

वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते.

गोंदिया : वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र यापैकी किती वृक्ष जगतात व किती मरतात, हा शोधाचा विषय ठरत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रोपटे जगतात, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे हे लागवड झालेल्या गावांनाच ठाऊक!यंदा सामाजिक वनीकरण विभागाला एक लाख नऊ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी एक लाख पाच हजार ७०० वृक्षांची लागवड पूर्ण झालेली असून काम सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. एक रोपटे लावण्यासाठी जवळपास ४५० रूपयांचे खर्च येते. यात रोपटे, पिंजरे, खड्डे व पाणी देणे या बाबींचा समावेश असतो. मात्र खरे काम वृक्ष लागवडीनंतर त्याचे संरक्षण व संवर्धनाचे असते. याकडे किती लक्ष दिले जाते, हासुद्धा शोधाचाच विषय.दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये एकूण ७७ हजार ६८२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७६ हजार ५०२ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९८ आहे. सन २०१३ मध्ये ८५ हजार ९०३ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार ९८५ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ आहे. तर सन २०१४ मध्ये ७३ हजार ४६८ वृक्षांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली होती. यापैकी ६८ हजार ४३८ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ असल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तेवढी जागा उपलब्ध असते का? याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला त्याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट कागदावर साध्य होते की खरोखर कृत्यातून होते, यावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)