शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:39 IST

जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : आतापर्यंत ७६.८८ टक्के रोवणी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी खरीप हंगामात १ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाअभावी यंदा १ लाख ७७ हजार ०९४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाची रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाने शासनाने पाठविलेल्या अहवालात वर्तवीली आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे.यावर्षी जिल्ह्यात १५ ते १७ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधव सुखावले होते. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आला होता. मात्र तेव्हापासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर काही शेतकºयांची रोवणी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमध्येच रोवणी झाली. रोवणीची ही टक्केवारी ७६.८८ आहे. जिल्ह्यातील २३.१२ टक्के क्षेत्रातील रोवणी पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.१ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरऐवजी एक लाख ७७ हजार ०९४ हेक्टरमध्येच रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता आहे.तर परिस्थिती गंभीरपावसाअभावी मागील काही दिवसांपासून उष्णतामान वाढले आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. ज्या शेतकºयांची रोवणी झाली त्यांना सुध्दा पावसाची गरज आहे. तर पावसाअभावी २३ टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात झालेली रोवणीजिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमधील रोवणीपैकी धानाची नर्सरी १८०२०.१९ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली. प्रत्यक्षात रोवणी एक लाख २८ हजार ४१३.२९ हेक्टरमध्ये झाली. तर आवत्या ७७३३.९८ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. तालुकास्तरावर गोंदिया तालुक्यात २६ हजार ३५६.९२ हेक्टर, गोरेगावात १५ हजार ५३० हेक्टर, तिरोडा येथे १७ हजार ७०८.६० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १५ हजार २४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे १९ हजार १४९, आमगावात १४ हजार ३५४.९५ हेक्टर, सालेकसा येथे १० हजार ३८५.८० हेक्टर व देवरी येथे १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्तसध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकºयांना विविध कामांसाठी कृषी विभागाशी संबंध येतो. मात्र गोंदिया येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. रोवणी आणि दुष्काळी परिस्थितीचे अहवाल पाठविण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली असून ते तेथे रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र नगरहून गोंदियाला बदली झालेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अद्यापही गोंदियाच्या कार्यालयात रुजू झाले नाहीत. ते १० ते १२ तारखेच्या नंतर रुजू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी