शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:39 IST

जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : आतापर्यंत ७६.८८ टक्के रोवणी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी खरीप हंगामात १ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाअभावी यंदा १ लाख ७७ हजार ०९४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाची रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाने शासनाने पाठविलेल्या अहवालात वर्तवीली आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे.यावर्षी जिल्ह्यात १५ ते १७ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधव सुखावले होते. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आला होता. मात्र तेव्हापासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर काही शेतकºयांची रोवणी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमध्येच रोवणी झाली. रोवणीची ही टक्केवारी ७६.८८ आहे. जिल्ह्यातील २३.१२ टक्के क्षेत्रातील रोवणी पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.१ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरऐवजी एक लाख ७७ हजार ०९४ हेक्टरमध्येच रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता आहे.तर परिस्थिती गंभीरपावसाअभावी मागील काही दिवसांपासून उष्णतामान वाढले आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. ज्या शेतकºयांची रोवणी झाली त्यांना सुध्दा पावसाची गरज आहे. तर पावसाअभावी २३ टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात झालेली रोवणीजिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमधील रोवणीपैकी धानाची नर्सरी १८०२०.१९ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली. प्रत्यक्षात रोवणी एक लाख २८ हजार ४१३.२९ हेक्टरमध्ये झाली. तर आवत्या ७७३३.९८ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. तालुकास्तरावर गोंदिया तालुक्यात २६ हजार ३५६.९२ हेक्टर, गोरेगावात १५ हजार ५३० हेक्टर, तिरोडा येथे १७ हजार ७०८.६० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १५ हजार २४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे १९ हजार १४९, आमगावात १४ हजार ३५४.९५ हेक्टर, सालेकसा येथे १० हजार ३८५.८० हेक्टर व देवरी येथे १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्तसध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकºयांना विविध कामांसाठी कृषी विभागाशी संबंध येतो. मात्र गोंदिया येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. रोवणी आणि दुष्काळी परिस्थितीचे अहवाल पाठविण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली असून ते तेथे रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र नगरहून गोंदियाला बदली झालेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अद्यापही गोंदियाच्या कार्यालयात रुजू झाले नाहीत. ते १० ते १२ तारखेच्या नंतर रुजू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी