शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:39 IST

जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : आतापर्यंत ७६.८८ टक्के रोवणी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी खरीप हंगामात १ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाअभावी यंदा १ लाख ७७ हजार ०९४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाची रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाने शासनाने पाठविलेल्या अहवालात वर्तवीली आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे.यावर्षी जिल्ह्यात १५ ते १७ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधव सुखावले होते. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आला होता. मात्र तेव्हापासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर काही शेतकºयांची रोवणी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमध्येच रोवणी झाली. रोवणीची ही टक्केवारी ७६.८८ आहे. जिल्ह्यातील २३.१२ टक्के क्षेत्रातील रोवणी पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.१ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरऐवजी एक लाख ७७ हजार ०९४ हेक्टरमध्येच रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता आहे.तर परिस्थिती गंभीरपावसाअभावी मागील काही दिवसांपासून उष्णतामान वाढले आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. ज्या शेतकºयांची रोवणी झाली त्यांना सुध्दा पावसाची गरज आहे. तर पावसाअभावी २३ टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात झालेली रोवणीजिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमधील रोवणीपैकी धानाची नर्सरी १८०२०.१९ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली. प्रत्यक्षात रोवणी एक लाख २८ हजार ४१३.२९ हेक्टरमध्ये झाली. तर आवत्या ७७३३.९८ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. तालुकास्तरावर गोंदिया तालुक्यात २६ हजार ३५६.९२ हेक्टर, गोरेगावात १५ हजार ५३० हेक्टर, तिरोडा येथे १७ हजार ७०८.६० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १५ हजार २४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे १९ हजार १४९, आमगावात १४ हजार ३५४.९५ हेक्टर, सालेकसा येथे १० हजार ३८५.८० हेक्टर व देवरी येथे १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्तसध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकºयांना विविध कामांसाठी कृषी विभागाशी संबंध येतो. मात्र गोंदिया येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. रोवणी आणि दुष्काळी परिस्थितीचे अहवाल पाठविण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली असून ते तेथे रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र नगरहून गोंदियाला बदली झालेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अद्यापही गोंदियाच्या कार्यालयात रुजू झाले नाहीत. ते १० ते १२ तारखेच्या नंतर रुजू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी