शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रुपये थकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची ...

गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची बाब म्हणजे एखाद्या बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीची शिक्षा निरपराध व्यक्तीला भोगावी लागते. वाहतूक अपघातांतील बहुतांश प्रकरणांतील हीच स्थिती असते. यामुळेच वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. यातील १२६७५ कारवायांतील २७ लाख ५६ हजार ०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ५२५ कारवायांतील एक लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड अद्यापही संबंधितांवर थकून आहे.

----------------------------------

२०२१ मधील आकडेवारी काय सांगते

- किती जणांनी तोडला नियम - १३२००

एकूण दंडाची रक्कम -२८८४१००

किती व्यक्तींनी भरला दंड -१२६७५

भरलेला दंड - २७५६०५०

किती व्यक्तींनी दंड भरलाच नाही - ५२५

थकबाकी दंडाची रक्कम - १२८१००

१) २०२०-२०२१ मध्ये झालेली कारवाई (ग्राफ)

२०२०-२०२१

विना हेल्मेट १९

विना सीटबेल्ट २४२५

ओव्हर स्पीड १५७

मोबाईलवर बोलणे ३०

नो पार्किंग २१९

ट्रिपल सीट ४१०

विना लायसन्स ८३३३

फॅन्सी नंबर प्लेट १६

म्युझिकल हॉर्न ४९

--------------------------------

परवाना नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया

- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.

- आजघडीला ५००-१००० रुपये भरले तर गाडी आपल्या घरात आणता येते अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रत्येकाकडे आता दुचाकी झाली आहे. मात्र, दुचाकी घेऊनच होत नसून त्यासाठी परवाना काढावा लागतो याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही.

- परवाना नसल्यास वाहतूक पोलिसांकडून जास्तीत जास्त १०० रुपयांचे चलन होत असल्याचा समज आजही कित्येक नागरिकांत आहे. त्यामुळे परवाना काढण्याची भानगड पाळण्यापेक्षा १०० रुपये दिलेले बरे अशा तोऱ्यात ते वागतात.

----------------------------

लवकर दंड न भरल्यास...

- वाहतूक नियंत्रण शाखेने एखाद्या वाहनावर कारवाई केल्यानंतर त्याने दंडाची रक्कम कित्येक दिवस भरली नसली तरीही त्यावर व्याज लावता येत नही. आहे ती रक्कमच नियमानुसार घ्यावी लागते.

- एखाद्या व्यक्तीने दंडात्मक कारवाई झाल्यावर पैसे न भरल्यास वाहतूक नियंत्रण शाखा दंडाची रक्कम वाढवू शकत नाही. यामुळेही कित्येकांकडून दंड थकविला जातो.

- मात्र, दंडाची रक्कम थकवून असलेली व्यक्ती दुसऱ्यांदा वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्यास त्याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते व अशात वाहन जप्त केले जाते. जुनी रक्कम वसूल झाल्यावर ते वाहन सोडले जाते.