शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

१२३४ मतदान केंद्र सज्ज

By admin | Updated: October 14, 2014 23:19 IST

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक रणसंग्रामाचा बुधवारी (दि.१५) मतदानाने शेवट होणार आहे. चारही विधानसभा मतदार संघात मतदानासाठी १२३४ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत.

आज मतदान : २१ संवेदनशील तर २१ उपद्रवी केंद्र, चोख बंदोबस्तगोंदिया : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक रणसंग्रामाचा बुधवारी (दि.१५) मतदानाने शेवट होणार आहे. चारही विधानसभा मतदार संघात मतदानासाठी १२३४ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. त्यात गोंदिया मतदार संघातील २१ केंद्र संवेदनशील असून नक्षलग्रस्त आमगाव मतदार संघातील १५ व अर्जुनी मोरगाव मतदार संघातील ६ असे २१ मतदान केंद्र उपद्रवी म्हणून नोंदविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.निवडणुकीच्या या कामात लागलेल्या ५५६३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून स्ट्राँग रूममधून मतदान यंत्रांची तपासणी करून ते ताब्यात घेऊन आपापले मतदान केंद्र गाठण्यास सुरूवात केली. सायंकाळपर्यंत सर्व केंद्रावरील कर्मचारी दिलेल्या ठिकाणी पोहोचले. बुधवारी सकाळी ७ वाजताच सर्व केंद्रांवर मतदानाला सुरूवात होणार आहे. मात्र आमगाव विधानसभा मतदार संघातील केंद्रांवर केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान सुरू राहणार आहे. इतर केंद्रांवर सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार आहे. यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी आपापल्या मतदार संघाच्या स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्र घेऊन पोहोचतील. विशेष म्हणजे यावेळी महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना या निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे. ९९.९९ टक्के महिलांना घेतलेले नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांनी सांगितले.गोंदिया मतदार संघातील मतदान यंत्र जिल्हाधिकारी कार्यालयामागील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात, तिरोडा मतदार संघातील यंत्र तेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, अर्जुनी मोरगाव मतदार संघातील यंत्र तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत, तर देवरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान यंत्र तेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवले जाणार आहेत.दरम्यान गुप्त प्रचाराअंतर्गत सायंकाळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. यासाठी विश्वासातील कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसत होते. (जिल्हा प्रतिनिधी)