शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून १२ हजार वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 01:57 IST

आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.

नाना पटोले : झाडांचे संगोपन करणाऱ्यास खासदार चषक पुरस्कार अर्जुनी मोरगाव : आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जंगलामधील वृक्षकटाई थांबवून वृक्ष रोपणाबरोबर त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची आज गरज आहे. झाडांचे रक्षण करण्यात आपण कमी पडल्याने दिवसेंदिवस पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी तसेच पावसाचे प्रमाण वाढवून शेतकऱ्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावा-गावांमध्ये वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करुन मोकळे न होता, त्यांच्या संगोपणाची जबाबदारी घेण्यास प्राथमिकता देणे आवश्यक आहे. जो कोणी जास्तीत जास्त झाडे लावून जगवेल, त्यांना खासदार चषक पुरस्कार अंतर्गत पारितोषिक देवून गौरविण्यात येईल, अशी घोषणावजा प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या येथील क्षेत्र सहाय्यक कार्यालयाच्या कृत्रिम पुनरनिभित मिश्र रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.रोपवनात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, निलिमा पाटील भुजबळ, प्रोडिसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सी.एस. उदापुरे, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, ठाणेदार नामदेव बंडगर, सरपंच राधेशाम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, एस.एस.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजिव पाटणकर, प्राचार्य एन.एस. डोंगरवार उपस्थित होते.शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील मिश्र रोपवनात तालुक्यातील विविध संघटना व लोकसहभागातून श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने १२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, तंमुस, मानवता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, बहुउद्देशिय विद्यालय, कल्की मानव सेवा समिती, तिबेटीयन मैत्री संघ तिबेट वसाहत, देऊळगाव (बोदरा), निमगाव, खांबी, अरततोंडी, तिडका येथील वन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील नागरिकांसह दोन हजाराच्या लोकसहभागातून विविध प्रजांतीच्या १२ हजार वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. वनमहोत्सवाला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिने झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. उद्घाटननीय समारंभाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. आभार प्रोडिसीएफ राहुल पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)तिबेटियन्सचा सहभाग२० कि.मी. अंतरावरुन आलेल्या तिबेटीयन मैत्री संघाच्या ४५ पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तिने वृक्ष लागवड केली. सोनम फुटी या ६९ वर्षीय महिलाचा त्यात समावेश होता. जंगलातील झाडे आपण तोडतो, त्या बदल्यात झाडे लावून त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड काळाची गरज आहे. शुद्ध हवा, पाणी मिळण्यासाठी झाडे लावावे अशी ती लोकमत जवळ बोलले.