शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

लोकसहभागातून १२ हजार वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 01:57 IST

आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.

नाना पटोले : झाडांचे संगोपन करणाऱ्यास खासदार चषक पुरस्कार अर्जुनी मोरगाव : आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जंगलामधील वृक्षकटाई थांबवून वृक्ष रोपणाबरोबर त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची आज गरज आहे. झाडांचे रक्षण करण्यात आपण कमी पडल्याने दिवसेंदिवस पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी तसेच पावसाचे प्रमाण वाढवून शेतकऱ्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावा-गावांमध्ये वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करुन मोकळे न होता, त्यांच्या संगोपणाची जबाबदारी घेण्यास प्राथमिकता देणे आवश्यक आहे. जो कोणी जास्तीत जास्त झाडे लावून जगवेल, त्यांना खासदार चषक पुरस्कार अंतर्गत पारितोषिक देवून गौरविण्यात येईल, अशी घोषणावजा प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या येथील क्षेत्र सहाय्यक कार्यालयाच्या कृत्रिम पुनरनिभित मिश्र रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.रोपवनात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, निलिमा पाटील भुजबळ, प्रोडिसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सी.एस. उदापुरे, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, ठाणेदार नामदेव बंडगर, सरपंच राधेशाम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, एस.एस.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजिव पाटणकर, प्राचार्य एन.एस. डोंगरवार उपस्थित होते.शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील मिश्र रोपवनात तालुक्यातील विविध संघटना व लोकसहभागातून श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने १२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, तंमुस, मानवता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, बहुउद्देशिय विद्यालय, कल्की मानव सेवा समिती, तिबेटीयन मैत्री संघ तिबेट वसाहत, देऊळगाव (बोदरा), निमगाव, खांबी, अरततोंडी, तिडका येथील वन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील नागरिकांसह दोन हजाराच्या लोकसहभागातून विविध प्रजांतीच्या १२ हजार वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. वनमहोत्सवाला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिने झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. उद्घाटननीय समारंभाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. आभार प्रोडिसीएफ राहुल पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)तिबेटियन्सचा सहभाग२० कि.मी. अंतरावरुन आलेल्या तिबेटीयन मैत्री संघाच्या ४५ पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तिने वृक्ष लागवड केली. सोनम फुटी या ६९ वर्षीय महिलाचा त्यात समावेश होता. जंगलातील झाडे आपण तोडतो, त्या बदल्यात झाडे लावून त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड काळाची गरज आहे. शुद्ध हवा, पाणी मिळण्यासाठी झाडे लावावे अशी ती लोकमत जवळ बोलले.