शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून १२ हजार वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 01:57 IST

आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.

नाना पटोले : झाडांचे संगोपन करणाऱ्यास खासदार चषक पुरस्कार अर्जुनी मोरगाव : आजघडीला निसर्गाचे चक्र बदलल्याचे दिसत आहे. निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. अजाणतेपणे वृक्षतोड झाल्याने, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जंगलामधील वृक्षकटाई थांबवून वृक्ष रोपणाबरोबर त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची आज गरज आहे. झाडांचे रक्षण करण्यात आपण कमी पडल्याने दिवसेंदिवस पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी तसेच पावसाचे प्रमाण वाढवून शेतकऱ्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावा-गावांमध्ये वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करुन मोकळे न होता, त्यांच्या संगोपणाची जबाबदारी घेण्यास प्राथमिकता देणे आवश्यक आहे. जो कोणी जास्तीत जास्त झाडे लावून जगवेल, त्यांना खासदार चषक पुरस्कार अंतर्गत पारितोषिक देवून गौरविण्यात येईल, अशी घोषणावजा प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या येथील क्षेत्र सहाय्यक कार्यालयाच्या कृत्रिम पुनरनिभित मिश्र रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.रोपवनात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, निलिमा पाटील भुजबळ, प्रोडिसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी सी.एस. उदापुरे, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, ठाणेदार नामदेव बंडगर, सरपंच राधेशाम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, एस.एस.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजिव पाटणकर, प्राचार्य एन.एस. डोंगरवार उपस्थित होते.शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील मिश्र रोपवनात तालुक्यातील विविध संघटना व लोकसहभागातून श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने १२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, तंमुस, मानवता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. हायस्कूल, अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, बहुउद्देशिय विद्यालय, कल्की मानव सेवा समिती, तिबेटीयन मैत्री संघ तिबेट वसाहत, देऊळगाव (बोदरा), निमगाव, खांबी, अरततोंडी, तिडका येथील वन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील नागरिकांसह दोन हजाराच्या लोकसहभागातून विविध प्रजांतीच्या १२ हजार वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. वनमहोत्सवाला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिने झाडे जगविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. उद्घाटननीय समारंभाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. आभार प्रोडिसीएफ राहुल पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)तिबेटियन्सचा सहभाग२० कि.मी. अंतरावरुन आलेल्या तिबेटीयन मैत्री संघाच्या ४५ पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तिने वृक्ष लागवड केली. सोनम फुटी या ६९ वर्षीय महिलाचा त्यात समावेश होता. जंगलातील झाडे आपण तोडतो, त्या बदल्यात झाडे लावून त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड काळाची गरज आहे. शुद्ध हवा, पाणी मिळण्यासाठी झाडे लावावे अशी ती लोकमत जवळ बोलले.