शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेची १०० टक्के कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:12 IST

शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनवेगाव (खु) मध्ये १५० रुपये रोजी : मजुरीसाठी लागतो १०० रुपये हप्ता

आॅनलाईन लोकमततिरोडा : शासनाच्या सर्वांच्या हाताला काम या धोरणाअंतर्गत तालुक्यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) जवळपास सर्वच गावात कामे सुरु झाल्याची माहिती आहे. परंतु त्यात अनेक गावातील मजुरांना १५० ते १६० मजूरी दररोजची मिळविण्यासाठी १०० रुपये हप्ता सदर कामावर नियुक्त रोजगार सेवक किंवा एखाद्या विश्वासपात्र हस्तकाद्वारे ही रक्कम कनिष्ठ अभियंता वसूल करतो अशी ओरड तालुक्यात मागील वर्षापासून सुरु आहे.तालुक्यातील नवेगाव (खु.) येथील माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर सदर बाब सत्य असल्याची माहिती मिळाली. नवेगाव (खु.) मध्ये तुमसर रोडच्या जवळच्या मोहबागेतून एलोरा रेल्वेगेटच्या पांदणरस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर २८९ मजूर असून त्यांना मिळत असलेल्या रोजीनुसार काम प्रत्यक्षात होत नाही. परंतु चिरिमिरी देऊन १०० रुपये हप्त्याप्रमाणे मजुरांची रोजी १४० ते १५० रुपये रोज काढली जाते आहे असल्याची माहिती आहे.शासनाने ठरवून दिलेले सरासरी शासन दर २०१ रुपये प्रति दिवस आहे. परंतु ही निश्चित रोजी वृक्षलागवड, कंपाऊंड, नाल्यावरील काम, झाडे कापने अशा बाबींसाठी आहे. माती खोदकामात नियमित दर लागू नाही. आजच्या यंत्रयुगात व भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे मनुष्याची काम करण्याची क्षमता फारच कमी झालेली आहे. परंतु शासनाचे निकष जुनेच आहेत. त्यामुळे मजूरवर्ग स्वत:ची रोजी वाढविण्यासाठी १०० रुपये हप्ता देत असल्याची माहिती आहे.कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची असल्यामुळे त्यांनाही हप्ता बाबीचे फारशे गांभीर्य नाही. कारणही तसेच आहे. १५००० ते २०,००० रुपये पगारावर काम करते असल्याने एका अभियंत्याला आजच्या युगात तरी परवडण्यासारखे नाही. ही बाब सुद्धा शासनाने दखल घेण्यासारखी आहे. यात दोषी कोणाला ठरवावे हा सुद्धा प्रश्नच आहे. मजूर वर्गाला चिरिमिरी देता का असे विचारले असता कोणीही पुढे येऊन सांगायला तयार नाही. मोजमापानुसार रोजी काढली असता ३० ते ३४ रुपये रोजी मिळेल. यात आमचेच नुकसान होणार, त्यामुळे दबक्या आवाजात पैसे दिल्याचे मजूर सांगतात. हा प्रकार संपूर्ण तालुक्यातच सुरू असल्याचेही बोलले जात आहे.अनेक लोकप्रतिनिधी व लोकांचे मला फोन आले त्यात मजुरांकडून हप्ता वसूली होत आहे. अशी तक्रार मिळाली. त्यानंतर मी स्वत: कामावर जावून मोजमाप केली असता प्रत्यक्षात मजुरांचे त्यांना मिळत असलेल्या रोजीप्रमाणे काम होत नाही. परंतु मजुरांना योग्य रोजी मिळत असल्याने व कोणीही तक्रार केली नसल्याने कार्यवाही करता येत नाही.एल.डी. चव्हाणसहाय्यक कार्यक्रम अधिकारी एपीओगावात सुरु असलेल्या एमआरईजीएस च्या कामात मजूर पैसे देतात किंवा नाही याबाबद नक्की माहिती नाही. परंतु चर्चा आहे.मिनल अनिल पटलेसरपंच नवेगाव खुर्द.