शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

१० टक्केच सिंचन विहिरी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 01:35 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सिंचनासाठी सन २०१६-१७ व २०१७-१८...

दोन वर्षांत १५०० विहिरींचे उद्दिष्ट : ६६७ विहिरींचे काम झाले सुरू गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सिंचनासाठी सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांसाठी १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत मात्र फक्त १५२ विहिरींचेच म्हणजेच दिलेल्या मूळ उद्दिष्टाच्या १० टक्केच सिंचन विहीरींचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली पाहिजे म्हणून शासनाकडून आता मागेल त्याला विहीर अशी योजना राबविली जात आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरी तयार करण्यात येत आहेत. यात जिल्ह्याला १५०० विहीरींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सन २०१६-१७ व सन २०१७-१८ अशा दोन वर्षांत जिल्ह्याला ही उद्दीष्ट पूर्ती करावयाची आहे. यात सालेकसा व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यात प्रत्येकी १५० सिंचन विहिरी तयार करावयाच्या आहेत. तर उर्वरीत सहा तालुक्यांना प्रत्येकी २०० सिंचन विहिरी तयार करायच्या आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ६६७ विहिरींचे बांधकाम सुरु करण्यात आले. यातील १५२ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या कामातील ५१५ विहीरींचे काम अद्याप अपूर्ण आहे. यातंर्गत, आमगाव तालुक्यात १५३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८१, देवरी तालुक्यात ११९, गोंदिया तालुक्यात १०१, गोरेगाव १०९, तिरोडा तालुक्यात ८३ सिंचन विहिरींचे काम सुरु करण्यात आले. सालेकसा तालुक्यात १६ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ५ विहिरींचे काम सुरु आहे. तर आमगाव तालुक्यात १७, अर्जुनी-मोरगाव ४७, देवरी २२, गोंदिया १२, गोरेगाव १६, सडक-अर्जुनी व तिरोडा येथे प्रत्येकी ६ तर सालेकसा तालुक्यात २ विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेले सिंचन विहिरींचे उद्दीष्ट फक्त १० टक्के साध्य झाले. तर ९० टक्के विहिरींचे काम शिल्लक आहेत. पुढच्या वर्षात १३४८ विहिरींचे काम होईल का? हा प्रश्नचिन्ह आहे. (तालुका प्रतिनिधी) -५१५ विहिरींचे काम अपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दीष्टापैकी फक्त १५२ सिंचन विहिरी तयार झाल्या असून ५१५ विहिरींचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्याला दिलेल्या १५०० विहीरींच्या उद्दीष्टापैकी ७८४ सिंचन विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही. ज्या तालुक्यात विहिरींचे काम अपूर्ण आहे त्यात आमगाव तालुक्यातील १४५ विहिरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६६, देवरी तालुक्यातील १०६, गोंदिया ९१, गोरेगाव ९३, सडक-अर्जुनी ४, सालेकसा १६ व तिरोडा ४२ विहिरींचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली मागेल त्याला विहीर देण्याची योजना शासनाने सुरु केली. सुरु करताना गाजावाजा करण्यात आला. परंतु या विहिरींसाठी आलेल्या अर्जांना प्रलंबित ठेवले. काही ठिकाणी काम सुरु केले पण संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल की नाही हे सांगता येत नाही.