शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

१० लाख क्विंटलने सोयाबीनची आवक घटली

By admin | Updated: December 4, 2014 23:12 IST

जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे

दुष्काळाच्या झळा : सोयाबीनच्या उत्पन्नात यंदा विक्रमी तूट; शेतकरी हवालदिलवर्धा : जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तब्बल १० लाख क्विंटल सोयाबीनची आवक कमी झाली आहे. झालेली आवक या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्याच्या आसपासच आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ ४ लाख १३ हजार २८७ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे. पावसाच्या दडीने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा करण्यापासून ते काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. पहिली पेरणी झाली तिही पावसाच्या दडीमुळे मोडकळीस निघाली. दुबार पेरणी झाली तिची अवस्थाही तशीच झाली. तिबार पेरणी केली. पेरणी करून पिकाची वाढ होत नाही तोच ते सवंगण्याची वेळ आली. केवळ तीन महिन्याच्या कालावधीचे असलेले हे पीक कापणीची वेळ येताच वाळूू लागले. यामुळे सोयाबीनची उतारी येणारच नसल्याचा साऱ्यांचा अंदाज होता. शेतकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरला. शेतकऱ्यांनी वेळ आल्यावर सोयाबीनची सवंगणी करून कापणी केली. यात कोणला एका एकरात क्विंटलभर तर कुणाला अर्धा क्विंटलच्यावर सोयाबीन झाले नाही. मळणीत हाती आलेला सोयाबीनचा आकारही ज्वारीच्या दाण्यासारखा दिसला. हा दाणा पाहून भावही मिळण्याची आशा मावळली.शेतकऱ्यांनी मळणी करून काढलेले सोयाबीन बाजारात आणले खरे पण ते इतर वर्षांच्या तुलनेत कमीच राहिल्याचे जिल्ह्यात असलेल्या सातही बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या काळापर्यंत बाजार समितीत झोलेली सोयाबीनची आवक इतर वर्षांच्या तुलनेत कमी असल्याची दिसून आली आहे. ही घट हजारांची नाही तर लाखांच्या घरात आहे. सोयाबीन विकून रबी हंगाम साजरा करण्याची शेतकऱ्यांची असलेली आशा या घटीमुळे धुळीस मिळत असल्याचे वास्तव आहे. (प्रतिनिधी)