शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

१० लाख क्विंटलने सोयाबीनची आवक घटली

By admin | Updated: December 4, 2014 23:12 IST

जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे

दुष्काळाच्या झळा : सोयाबीनच्या उत्पन्नात यंदा विक्रमी तूट; शेतकरी हवालदिलवर्धा : जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र यंदाचा दुष्काळ या तीन वर्षापेक्षा अधिक असल्याचे जिल्ह्यातील तीनही बाजार समितीत झालेली सोयाबीनची आवक सांगत आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तब्बल १० लाख क्विंटल सोयाबीनची आवक कमी झाली आहे. झालेली आवक या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्याच्या आसपासच आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ ४ लाख १३ हजार २८७ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे. पावसाच्या दडीने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा करण्यापासून ते काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. पहिली पेरणी झाली तिही पावसाच्या दडीमुळे मोडकळीस निघाली. दुबार पेरणी झाली तिची अवस्थाही तशीच झाली. तिबार पेरणी केली. पेरणी करून पिकाची वाढ होत नाही तोच ते सवंगण्याची वेळ आली. केवळ तीन महिन्याच्या कालावधीचे असलेले हे पीक कापणीची वेळ येताच वाळूू लागले. यामुळे सोयाबीनची उतारी येणारच नसल्याचा साऱ्यांचा अंदाज होता. शेतकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरला. शेतकऱ्यांनी वेळ आल्यावर सोयाबीनची सवंगणी करून कापणी केली. यात कोणला एका एकरात क्विंटलभर तर कुणाला अर्धा क्विंटलच्यावर सोयाबीन झाले नाही. मळणीत हाती आलेला सोयाबीनचा आकारही ज्वारीच्या दाण्यासारखा दिसला. हा दाणा पाहून भावही मिळण्याची आशा मावळली.शेतकऱ्यांनी मळणी करून काढलेले सोयाबीन बाजारात आणले खरे पण ते इतर वर्षांच्या तुलनेत कमीच राहिल्याचे जिल्ह्यात असलेल्या सातही बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या काळापर्यंत बाजार समितीत झोलेली सोयाबीनची आवक इतर वर्षांच्या तुलनेत कमी असल्याची दिसून आली आहे. ही घट हजारांची नाही तर लाखांच्या घरात आहे. सोयाबीन विकून रबी हंगाम साजरा करण्याची शेतकऱ्यांची असलेली आशा या घटीमुळे धुळीस मिळत असल्याचे वास्तव आहे. (प्रतिनिधी)