शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात २ वर्षांत १ हजार ६९० घरकूल मंजूर

By admin | Updated: June 23, 2014 00:11 IST

तिरोडा तालुक्यात दोन वर्षात रमाई, इंदिरा आणि राजीव गांधी या तीन योजनेंतर्गत १ हजार ६९० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१२-१३ मध्ये १ हजार ३७७ घरकूल मंजूर करण्यात आले होते.

काचेवानी : तिरोडा तालुक्यात दोन वर्षात रमाई, इंदिरा आणि राजीव गांधी या तीन योजनेंतर्गत १ हजार ६९० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१२-१३ मध्ये १ हजार ३७७ घरकूल मंजूर करण्यात आले होते. मात्र २०१३-१४ करिता इंदिरा आवास योजनेचे २३३ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. रमाई योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये ७३२, इंदिरा आवास योजनेच्या २३६ व राजीव गांधी आवास योजनेच्या ४०९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. बीपीएल धारकांना आणि गोरगरिबांना निवाऱ्याची सोय व्हावी याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाने घरकुलाची योजना आखली. या योजनेतून काही लोकांना राहण्याची सोय झाली. तर काही प्रमाणात या योजनेचा दुरुपयोगही करण्यात आला आहे. रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि राजीव गांधी अशा तीन योजनेतून घरकूल मंजूर केले जातात. घरकुलाकरिता मंजूर निधीपैकी सर्वाधिक कमी निधी इंदिरा आवासची होती.त्यात शासनाने वाढ करुन एक लाख केली आहे. ही वाढ एप्रिलच्या नंतरकरिता न ठेवता आर्थिक वर्ष २०१२-१३ व २०१३-१४ करिता असावी, अशी मागणी जनतेने केली आहे.आवास योजनेला देण्यात येणारी निधी सर्वाधिक कमी इंदिरा आवास योजनेतून ६८ हजार, रमाई योजनेतून ७० हजार आणि राजीव गांधी योजनेतून ६८ हजार ५०० एवढी होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात इंदिरा आवासच्या निधीत ३२ हजारांनी वाढ करुन एक लाख रूपये करण्यात आले आहेत. करण्यात आलेली वाढ २०१४ च्या एप्रिल नंतरच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र असे करणे न्यायसंगत होणार नसून २०१२-१३ पासून लाभार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रमाई योजनेंतर्गत घरकुलांची मंजुरी समाज कल्याण विभाग देते. इंदिरा आवासची जि.प. आणि राजीव गांधी आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी पालकमंत्री देतात. या वर्षाला रमाई व राजीव गांधी योजनेतून एकही घरकुल मंजूर करण्यात आले नाहीत. तिरोडा लालुक्यात १६९० घरकुलांपैकी ७० टक्के घरकूल पूर्ण झाल्याची माहिती स्थापत्य अभियंता यु.एन. बिसेन यांनी सांगितली आहे.रमाई योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या बीपीएल धारकांना देण्यात येणाऱ्या घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्यांचे नाव बीपीएलमध्ये नाहीत असे काही नागरिक आहेत की ज्यांना राहण्याची मुद्दामच सोय नाही. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गातसुद्धा अनेक कुटुंब आहेत की त्यांना घरे नाहीत. त्यांना निवाऱ्याची सोय त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)