शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

१ लाख २८ हजार खड्डे वृक्षारोपणाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले.

ठळक मुद्देयंदा ३३ कोटी वृक्ष लागवड योजना वांद्यात । सत्ता बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेवून वृक्षारोपण केले होते. परंतु दिलेल्या उद्दिष्टापैकी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींनी एक लाख २८ हजार ३६९ खड्डे खोदल्यानंतरही त्यात वृक्षारोपणच करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी १७ लाख १३ हजार ७५० खड्डे संबधीत ग्रामपंचायतींनी खोदले. वृक्षलागवडासाठी जिल्ह्यातील २२ हजार १८८ जणांचा लोकसहभाग होता. या लोकसहभागातून खोदण्यात आलेल्या खड्यांमध्ये रोपटे लावून वृक्षसंवर्धन करायचे होते. परंतु १५ लाख ८५ हजार ३८१ रोपटे लावण्यात आले होते. उर्वरीत १ लाख २८ हजार ३६९ खड्यांमध्ये वृक्षारोपणच करण्यात आले नाही.शासनाने गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. खोदलेल्या खड्यांसाठी रोपटे देखील मागविण्यात आले. परंतु त्या खड्यात रोपटे लावण्यात आले नाही. काही ग्रामपंचायतींनी रोपटे न लावता ते बाहेर फेकून दिले होते. शासनाने वृक्षलागवडीसाठी निधी दिला नव्हता त्यामुळे ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जाते.यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविनापावसाळ्यात दरवर्षी एकाच खड्यात अनेकदा रोपटे लावले जात असल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी अनेक रोपटे जगले आणि त्यांचे संवर्धनही करण्यात आले. परंतु वृक्ष लागवडीकडे तत्कालीन सरकारचे लक्ष होते. आता ठाकरे सरकार आले. परंतु या ठाकरे सरकारला कोरोना या विषाणूशी लढा देण्यातच वेळ लागत असल्याने वृक्षलागवडीचा संकल्प यंदा मागे पडला. यंदाच्या पावसाळ्यात स्वयंत्स्फूर्तीने वृक्ष लागवड केल्यास वृक्ष लागवड होईल. अन्यथा यंदाचा पावसाळा वृक्षलागवडीविना जाणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforest departmentवनविभाग