शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

विदेशातील गोमंतकीयांच्या येथील जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी कायदा दुरुस्ती येणार- विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 17:38 IST

पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल.

पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली. विदेशात असलेल्या गोवेकरांच्या जमिनी खोटी कागदपत्रे करुन किंवा अन्य गैरप्रकारे विकल्या जाण्याचे वाढते प्रकार घडत आहेत. नुकत्याच आपल्या दुबई दौ-यातही तेथील गोमंतकीयांकडून अशा तक्रारी आल्याचे ते म्हणाले.अनेकदा पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी ज्याच्याकडे दिलेली आहे ती व्यक्ती मालकाला पत्ता लागू न देता गुपचूपपणे जमीन विकून मोकळी होते. आखातात किं वा विदेशात असलेले गोमंतकीय जेव्हा गोव्यात परत येतात तेव्हा हा प्रकार उघडकीस येतो परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. हे प्रकार रोखण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी येत्या अधिवेशनातच विधेयक आणले जाईल.गोवा विधानसभेचे पाच दिवसीय अधिवेशन येत्या १३ पासून सुरु होत आहे. कायदा आणून अशी सक्ती करता येईल की, जमिनी किंवा अन्य कोणतीही मालमत्ता विकताना मालक प्रत्यक्ष उपस्थित रहावा. त्यामुळे पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती गैरफायदा घेऊ शकणार नाही. भू नोंदणी कायद्यात त्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती आणली जाईल. सरदेसाई म्हणाले की, एका अंदाजानुसार केवळ संयुक्त अरब अमिरातमध्येच २ लाखांहून अधिक गोमंतकीय कामा-धंद्यानिमित्त आहेत. गोव्याची १५ लाख लोकसंख्या पाहता हा आकडाही मोठा आहे. ते गोव्याचे मतदारही आहेत. त्यांच्या अनेक समस्या त्यांनी बोलून दाखवल्या आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिनी त्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी भेट घालून देण्याचे अभिवचनही आपण दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.दुबई येथे गोवा फॉरवर्डने शनिवारी कार्यालयाचे उद्घाटन केले. सरदेसाई यांच्या म्हणण्यानुसार ह्यगोवा फॉरवर्ड फॉर युएईह्ण हा पक्ष्राचा प्रत्यक्ष भाग नव्हे तेथील गोमंतकीयांना या संघटनेखाली एकत्र आणणे हाच उद्देश आहे. गोवा फॉरवर्ड भाजपबरोबर आघाडी सरकारात आहे. हे सरकार कोणतेही धोरण निश्चित करताना जनतेच्या आशा आकांक्षांचा विचार करणार आहे. अनिवासी गोमंतकीयांचाही प्राधान्यक्रमे विचार होईल. अनिवासींनी गोव्यात बिगर प्रदूषणकारी किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी अशी आमची अपेक्षा आहे. आखातात किंवा अन्य ठिकाणी नोकरी, धंद्यानिमित्त असलेले गोवेकर जर परत गोव्यात येऊन स्थायिक होत असतील तर त्याला प्रोत्साहन व सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे सरदेसाई म्हणाले. दुबईपाठोपाठ कॅनडा तसेच आॅस्ट्रेलियातही जाण्याचा गोवा फॉरवर्डचा विचार आहे. दरम्यान, अलीकडेच गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश घेतलेले माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यानी रविवारी सांताक्रुझ मतदारसंघात कार्यालय सुरु केले. तिसवाडी तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड प्रबळ शक्ती म्हणून पुढे येईल, असा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.

टॅग्स :goaगोवा