शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

स्मृतिभृंशाने त्रस्त वृद्धांसाठी निवारा केंद्रे  उभारण्याच्या योजनेला गोव्यात शून्य प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:27 IST

स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.

पणजी : स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्या वृद्धांसाठी निवारा केंद्रे उभारण्याच्या सरकारच्या योजनेला गोव्यात बिगर शासकीय संघटनांकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात स्मृतिभृंशाने त्रस्त असंख्य वृद्ध असूनही याबाबतीत कुठलीही संघटना पुढे आलेली नाही.समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी याबाबत खेद व्यक्त करताना या केंद्रीय योजनेसाठी एकाही संघटनेने अद्याप अर्ज केलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘बिगर शासकीय संघटनांना या कामासाठी आवश्यक ती आर्थिक मदत देण्याची सरकारची तयारी आहे. ही केंद्रीय योजना आहे आणि इतर राज्यांमध्ये संघटनांनी निवारा केंद्रे उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गोव्यात राज्य सरकारच्याही अनेक योजना आहेत परंतु अवघ्याच बिगर शासकीय संघटना कार्यरत असल्याने तसेच त्यांना या कामात रस नसल्याने या संघटना पुढाकार घेत नाहीत. कोणत्याही संघटनेने अर्ज केल्यास 15  दिवसांच्या आत तो निकालात काढण्याची सरकारची तयारी आहे.’

वरील योजनेंतर्गत बिगर शासकीय संघटनांनी जागा शोधावी, कर्मचारीवर्ग घ्यावा, परिचारिका नेमाव्यात, असे नमूद करुन मडकईकर म्हणाले की, निवारा केंद्रे बांधण्यासाठीही निधी देण्याची तरतूद आहे. राज्यात वृद्धाश्रम आहेत. परंतु स्मृतिभृंशाचा आजार जडलेल्यांची देखभाल, शुश्रुषा करण्यासाठी विशेष असे एकही निवारा केंद्र नाही. गोव्यात स्मृतिभृंश रुग्णांसाठी काम करणा-या एका संघटनेच्या दाव्यानुसार राज्यात सुमारे ५ हजार असे त्रस्त रुग्ण आहेत. गोवा आणि केरळमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. २0११ च्या जनगणनेनुसार गोव्यात एकूण लोकसंख्येच्या ११.२ टक्के लोक ६0 वर्षे वयावरील होते तर केरळमध्ये हा आकडा १२.३ टक्के इतका आहे.गोव्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना अशा रुग्णांसाठी खास केंद्रे उघडण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. ज्या कुटुंबात अशा व्यक्ती आहेत त्यांना हाताळण्यासाठी कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

काही वर्षांपूर्वी डिमेंशिया सोसायटी आॅफ गोवा या संघटनेची गोमेकॉच्या न्युरो सर्जरी विभागाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली. डॉ. अमित डायस यांनी केलेल्या अभ्यासानुसार ६0 पेक्षा अधिक वय असलेल्या २.९ टक्के तर ८0 पेक्षा जास्त वय असलेल्या १२.५ टक्के वृद्धांना स्मृतिभृंशानं ग्रासले आहे. देशभरात ४0 लाख वृद्ध या आजाराने त्रस्त आहेत आणि आपल्या बाबतीत काय घडते आहे हे त्यांना माहीतदेखील नाही.

टॅग्स :goaगोवा