शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:41 IST

नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ सत्यात आणण्यासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. युवकांनी स्वतःचा विकास केला तरच देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे युवकांनी स्वतःचा विकास करून देशाचा विकास करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, अरविंद खुटकर, नितीन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी २०४७ विकसित भारत होण्यासाठी विविध मार्गे युवकांना जोडले आहे. अनेक युवक पंतप्रधानांच्या माय भारत पोर्टल अॅपवर जोडले जात आहेत. युवक हे देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे ते क्लीन इंडिया, फीट इंडिया सारखी मोहीम राबवित आहेत. त्यामुळे आज देशाचा युवक सर्वच बाजूंनी विकसित होत आहे. त्यांना सरकारचे बळ मिळत आहे.

इतर राज्याच्या तुलनेत गोवा हे एकमेव राज्य आहे ज्याने पंतप्रधांनांनी सुरू केलेल्या विविध योजना १०० टक्के पूर्ण केल्या आहेत. राज्यात हर घर जल १०० टक्के झाले आहे. हर घर शौचालय १०० टक्के पूर्ण झाले आहे. हर घर वीज अशा विविध क्षेत्रात गोवा अग्रेसर आहे. कारण गोव्यात आम्ही या योजना तळागळातील लोकापर्यंत राबवित असतो.

स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

आताच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आचार आत्मसात केले पाहिजेत. त्याच्या विचारांची प्रेरणा घेत स्वतःचा विकास केला पाहिजे. तरच देशाचा विकास होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत