शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 13:41 IST

नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत २०४७ सत्यात आणण्यासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. युवकांनी स्वतःचा विकास केला तरच देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे युवकांनी स्वतःचा विकास करून देशाचा विकास करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्रातर्फे पणजीत आयोजित केलेल्या आंतरराज्य आदान प्रदान कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, अरविंद खुटकर, नितीन सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी २०४७ विकसित भारत होण्यासाठी विविध मार्गे युवकांना जोडले आहे. अनेक युवक पंतप्रधानांच्या माय भारत पोर्टल अॅपवर जोडले जात आहेत. युवक हे देशाची खरी शक्ती आहे. त्यामुळे ते क्लीन इंडिया, फीट इंडिया सारखी मोहीम राबवित आहेत. त्यामुळे आज देशाचा युवक सर्वच बाजूंनी विकसित होत आहे. त्यांना सरकारचे बळ मिळत आहे.

इतर राज्याच्या तुलनेत गोवा हे एकमेव राज्य आहे ज्याने पंतप्रधांनांनी सुरू केलेल्या विविध योजना १०० टक्के पूर्ण केल्या आहेत. राज्यात हर घर जल १०० टक्के झाले आहे. हर घर शौचालय १०० टक्के पूर्ण झाले आहे. हर घर वीज अशा विविध क्षेत्रात गोवा अग्रेसर आहे. कारण गोव्यात आम्ही या योजना तळागळातील लोकापर्यंत राबवित असतो.

स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

आताच्या युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आचार आत्मसात केले पाहिजेत. त्याच्या विचारांची प्रेरणा घेत स्वतःचा विकास केला पाहिजे. तरच देशाचा विकास होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत