शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गव्याने घेतला तरुणीचा बळी, ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:38 IST

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात गव्यारेड्यांनी उच्छाद मांडला आहे.

पणजी : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळमेळावली या गावात गव्यारेड्यांनी उच्छाद मांडला आहे. गवे लोकवस्तीत पोहोचले असून, सोमवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणीचा गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. वन खाते काहीच उपाययोजना करत नसल्याने सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

गेल्या महिन्यातही गव्यारेड्यांच्या हल्ल्यात सत्तरी तालुक्यातील शिंगण या गावात ज्योती गावकर या महिलेचा बळी गेला होता. ती महिला काजू बागायतीत गेली असता तिच्यावर गव्याने हल्ला केला होता. त्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची चर्चा करून गव्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. गव्यांचा कळपच गावात येतो व यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतरही वन खात्याच्या यंत्रणेने काहीच उपाययोजना केली नाही.

पूजन मेळेकर ही 23 वर्षीय तरुणी एकाच्या स्कूटरवर बसून कामाला जात होती. ती उसगावमधील खासगी उद्योगात काम करते. सकाळी साडेसातच्या सुमारास गव्याने स्कुटरवर हल्ला केला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीररीत्या जखमी झाली. नंतर इस्पितळात तिचे निधन झाले. दुसरा इसम जखमी झाला. मुलीचे निधन झाल्यामुळे गावात शोककळा पसरली. दुपारी काही ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अगोदर उपवनपालांना बोलवा, आम्हाला गव्यांच्या समस्येवर तोडगा हवा आहे, असे संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक वनअधिका-याला सांगितले. मंत्री विश्वजित राणे यांनी पणजीहून सत्तरीत धाव घेतली. त्यांनी शेळमेळावली गावाला भेट दिली. मंत्री राणे हेही उपवनपालांशी बोलले. ग्रामस्थांनी नंतर मृतदेह स्वीकारले पण वन खात्याच्या अनास्थेबाबतचा लोकांमधील संताप कमी झालेला नाही.

वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी असंवेदनशील बनले आहेत. आपण गेल्या महिन्यात लिहिलेल्या पत्रानंतर उपाययोजना झाली असती तर दुसरा बळी गेला नसता, असे मंत्री राणे म्हणाले. गोवा सरकारने कर्नाटक किंवा महाराष्ट्र सरकारशी बोलावे व तेथून पथक आणून गव्यांविरुद्ध उपाययोजना करावी, या गव्यांना पुन्हा अभयारण्यात नेऊन सोडावे, अशी मागणी राणे यांनी केली आहे. दरम्यान, सत्तरी तालुक्यातील शेतक-यांची पिके रानडुक्कर, माकड, खेती, गवे वगैरे नष्ट करत असल्याने शेतकरीही नाराज आहेत.

टॅग्स :goaगोवा