शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 2:34 PM

कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

म्हापसा : गोवा सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे. १९ डिसेंबरपर्यंत मुक्तीच्या ६० व्या वर्षी राज्य स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार  केला असून त्या दृष्टी सरकरची पाऊल पडत आहे. यासाठी राज्यातील जनतेने सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पण महामारीमुळे लोकांपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याची गोव्याच्या मुक्तीची ६० वर्षे साजरी करताना जाणे योग्य असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.यावेळी मुख्य सचिव परिमल राॅय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, महसूल सचिव संजय कुमार, आमदार नीळकंठ हळर्णकर, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, उत्तर गोवा जि.प.च्या उपाध्यक्षा दीक्षा कानोळकर, कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर, पीर्ण सरपंच रिचा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.विविध खात्यांच्या १५२ हून जास्त सरकारी योजना आहेत. त्यातील अपवाद वगळता बहुतेक योजनांची माहिती लोकांना नाही. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा लाभ लोकांना व्हावा या उद्देशाने सरकार तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी विविध खात्यातील योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगारावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.यावेळी नीळकंठ हळर्णकर यांनी सरकारच्या कार्यक्रमाची स्तुती केली. ज्यावेळी आपण काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला त्यावेळी आपण चूक केली असल्याचे वाटत होते. पण आपण जे धाडस केले त्याचे सार्थक झाल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षा कानोळकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाElectionनिवडणूक