शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2024 10:30 IST

फोंडा येथील व्यावसायिक, विक्रेत्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आम्ही फक्त मतदानादिवशी लोकांची मते घेत नाही, तर लोकांना कसा देश हवा या संदर्भातले मत सुद्धा विचारात घेतो. लोकांचे विचार मागवूनच भाजप आपला जाहीरनामा ठरवतो. म्हणूनच हा देश सर्वांचा बनत चालला आहे इथल्या प्रत्येकाला हा देश आपला वाटू लागला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले

फोंडा येथील व्यावसायिक व विक्रेते यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री रवी नाईक, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपाईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सामान्यातला सामान्य माणूस उद्योग व्यवसायात प्रवेश करेल, अशी यंत्रणा निर्माण केली आहे. आज देशात उद्योग- व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून इथल्या नागरिकांनी त्याचा फायदा करून घ्यावा व उद्योग-व्यवसायात स्वतःची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लोकांना जे आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता करण्याची गॅरंटी घेणारे सरकार मागच्या दहा वर्षात भारतात आहे. काँग्रेसच्या काळात मतदारांना मान नव्हता, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान नव्हता भाजपमध्ये सामान्य कार्यकत्यांचा गौरव होतो, हे लक्षात आल्यानेच आज देशातील काँग्रेसचे सर्व मोठे नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. गरिबीवर बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. गरिबी हटावच्या घोषणा देत त्यांनी नेहमी सत्ता मिळवली. मात्र, देशातील गरिबी त्यांना हटविता आली नाही. याबाबत त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. गरिबांना मदतीचा हात देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.

व्यावसायिक व विक्रेते यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी सामान्य लोकांनी उद्योग-व्यवसायात प्रवेश करावा. म्हणून मुद्रासारख्या योजना राबविल्या आहेत. उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी पोषक वातावरण आज देशात निर्माण झाले आहे. गोव्यातही लोकांनी उद्योग-व्यवसायात उतरावे म्हणून गोवा सरकारने केंद्र सरकारच्या सहायाने अनेक कार्यक्रम राबविले आहेत.

महिला उद्योग-व्यवसायात यावेत म्हणून ईडीसीच्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा योजना सुरू केली आहे. जिथे तीस टक्के अनुदानाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. परराज्यातील दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्टार्ट अपसारखी महत्त्वाकांक्षी योजना राबविणारा भारत हा पहिला देश असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, कृषी क्षेत्रातील लोकांना पूर्वी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून कर्ज काढावे लागायचे. आज ती परिस्थिती राहिली नाही. भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. म्हणून सगळ्या योजना लोकांना मिळत आहेत. पूर्वी पैसा काँग्रेसच्या घशात जायचा.

आज सामान्य लोकांचा पैसा थेट बँकेत जात आहे, निवडणुकीवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यावेळी मते मागायला येतील, त्यावेळी त्यांना गोमंतकीय जनतेने या संदर्भात सवाल केला पाहिजे. आज केंद्र सरकारकडून गोव्याला एवढा निधी मिळत आहे, मग काँग्रेसच्या कार्यकाळात तो निधी का मिळत नव्हता. याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत