शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जानेवारीपर्यंत ५० बंधाऱ्यांचे काम हाती, डिसेंबरपर्यंत निविदा काढू: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:41 IST

सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जानेवारी २०२४ पर्यंत ५० बंधाऱ्यांची कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जलस्रोत खात्याने जलसंवर्धनाचा पुढाकार घेतला असून राज्यात १०० बंधारे बांधण्याचा मानस आहे. जलस्रोत मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, येत्या पावसाळ्यापूर्वी ६० ते ७० बंधारे बांधून पूर्ण होणार आहेत. यामुळे लोकांची पिण्याचा पाण्याची समस्या सुटणार आहे. पुढील तीन महिने कामाची निविदा जारी केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

दरम्यान, बंधारे बांधणे हे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पण काहीजण याला विरोध करत आहेत. प्रत्येक विकास कामाला लोकांनी विरोध करू नये. बंधारे बांधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. पाण्याचा समस्या सोडविण्यासाठी बंधारे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण याला विरोध करू नये. ज्या ठिकाणी खरोखरच पर्यावरणाची समस्या उद्भवत आहे तिथे सरकार पर्यायी व्यवस्था करते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्पांचे काम मार्गी लावले जात आहे. बंधारे प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. राज्यात येत्या काळात जास्तीत जास्त बंधारे बांधून पाण्याचे संवर्धन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोमंतकीयांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी वस्तूस्थिती न जाणून घेता प्रकल्पांना विरोध करणे टाळले पाहिजे. विरोधकांकडून कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता प्रकल्पांच्या कामात आडकाठी आणली जात असल्याचा आरोपही यावेळी मंत्री शिरोडकर यांनी केला.

शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी पैसे

शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे, त्यांना चतुर्थीपूर्वी पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन मंत्री शिरोडकर यांनी दिले आहे. यामुळे सर्व शेतकन्यांचे पैसे चतुर्थीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तसेच कामधेनू योजनेविषयी गावागावात मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आम्ही या योजनांविषयी प्रचार प्रसार करणार आहे, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा