शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जानेवारीपर्यंत ५० बंधाऱ्यांचे काम हाती, डिसेंबरपर्यंत निविदा काढू: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:41 IST

सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जानेवारी २०२४ पर्यंत ५० बंधाऱ्यांची कामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जलस्रोत खात्याने जलसंवर्धनाचा पुढाकार घेतला असून राज्यात १०० बंधारे बांधण्याचा मानस आहे. जलस्रोत मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, येत्या पावसाळ्यापूर्वी ६० ते ७० बंधारे बांधून पूर्ण होणार आहेत. यामुळे लोकांची पिण्याचा पाण्याची समस्या सुटणार आहे. पुढील तीन महिने कामाची निविदा जारी केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

दरम्यान, बंधारे बांधणे हे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पण काहीजण याला विरोध करत आहेत. प्रत्येक विकास कामाला लोकांनी विरोध करू नये. बंधारे बांधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील लोकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. पाण्याचा समस्या सोडविण्यासाठी बंधारे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण याला विरोध करू नये. ज्या ठिकाणी खरोखरच पर्यावरणाची समस्या उद्भवत आहे तिथे सरकार पर्यायी व्यवस्था करते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्पांचे काम मार्गी लावले जात आहे. बंधारे प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. राज्यात येत्या काळात जास्तीत जास्त बंधारे बांधून पाण्याचे संवर्धन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोमंतकीयांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी वस्तूस्थिती न जाणून घेता प्रकल्पांना विरोध करणे टाळले पाहिजे. विरोधकांकडून कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता प्रकल्पांच्या कामात आडकाठी आणली जात असल्याचा आरोपही यावेळी मंत्री शिरोडकर यांनी केला.

शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी पैसे

शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे, त्यांना चतुर्थीपूर्वी पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन मंत्री शिरोडकर यांनी दिले आहे. यामुळे सर्व शेतकन्यांचे पैसे चतुर्थीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तसेच कामधेनू योजनेविषयी गावागावात मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आम्ही या योजनांविषयी प्रचार प्रसार करणार आहे, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा