शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
3
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
4
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
5
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
6
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
7
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
8
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
9
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
10
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
11
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
12
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
13
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
14
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
15
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
16
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
17
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
18
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
19
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
20
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

महिला आंदोलकांच्या घरी जाऊन मानसिक छळ

By admin | Updated: March 13, 2015 00:54 IST

पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा

पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या जीव्हीकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुरुवारी डिचोली व पेडणे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या या प्रकारावर सरकारने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली. जीव्हीके व्यवस्थापन सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये फूट घालण्याचे प्रयत्न करत आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित पत्रे पाठविली. काहींना घरी जाऊन धमक्या दिल्या. महाराष्ट्रातील महिला कर्मचाऱ्यांनाही फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या. मात्र, कर्मचारी एकोपा सोडत नसल्याने व आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता महिला कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देणे व त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनांच्या कर्मचाऱ्यांकडून होऊ लागला आहे, असे संघटनेचे सचिव सागर प्रभुदेसाई यांनी सांगितले. याबाबत डिचोली येथील १0८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या सोनाली शिरोडकर यांना जीव्हीकेचे कर्मचारी सूरज नाईक व रफीक यांनी घरी जाऊन त्रास दिला. शिरोडकर यांना आंदोलनात सहभागी न होता पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी ते आग्रह करीत होते. नाईक व रफीक ज्या वेळी शिरोडकर यांच्या घरी गेले होते, तेव्हा घरात कुणी नसल्याने शिरोडकर यांनी शांतपणे सगळे ऐकून विचार करून सांगते, असे सांगून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तसेच पेडणे येथील रुग्णवाहिका कर्मचारी प्रमिला पेडणेकर यांच्या घरी जाऊन त्यांनाही धमकी देण्यात आली. सूरज नाईक व रफीक हे ज्या वेळी प्रमिला यांच्या घरी पोहोचले तेव्हा घरात प्रमिला व तिची आठ वर्षांची मुलगी होती. प्रमिलालाही आंदोलनात सहभागी असल्याने मानसिक त्रास देण्यात आला. त्यानंतर प्रमिला यांनी नाईक व रफीक यांच्याविरोधात पेडणे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, येथे आंदोलनाला बसणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही आता व्यवस्थापनाकडून होत असलेल्या त्रासाबाबत भीती वाटू लागली आहे. आंदोलनकर्ते राज्यातील विविध गावांतून ये-जा करत असताना त्यांच्या जीवाला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न ते विचारत आहेत. सरकारने या विषयावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असून पुढील तीन दिवसांत या विषयावर तोडगा काढण्यात येत नसेल तर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. (प्रतिनिधी)