शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2024 08:25 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडिको रेमेडीज या औषधनिर्मिती कंपनीने प्रकल्पात नोकरभरतीसाठी बोईसर-महाराष्ट्र येथे मुलाखती ठेवल्याने गोव्यात एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या या भरतीविरोधात गोवा फॉरवर्डसह आप, आरजी व काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर कंपनीने मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला.

बुधवारी सायंकाळी कंपनीने ती जाहिरात रद्द केल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. वेर्णा येथील इंडोको रेमेडीज या औषध कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रातील बोईसर येथे मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करताच सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यातील विरोधी पक्षांनी कंपनीसह सरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने शेवटी संबंधित कंपनीने ही नोकरभरती प्रक्रिया रद्द केल्याचे पत्र दिले. 

दरम्यान या मुद्द्यावरून गोवा फॉरवर्ड, आरजी पक्षाने संताप व्यक्त करत राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला.

स्थानिकांना प्राधान्य हवेच

गोमंतकीयांना खासगी उद्योगातील नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण मिळावे यासाठी गोवा फॉरवर्ड वेळोवेळी विधानसभेतही आवाज उठवत आहे. खासगी उद्योगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या न देण्यापासून रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. गोव्यातील युवकांना रोजगारात प्राधान्य देणारी धोरणे सरकारने लागू केली पाहिजेत. तसेच या युवकांना पुरेसे कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

नोकरभरतीवर सरकारचा अंकुश हवा

काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी फार्मा कंपनी गोव्यात प्लांट सुरू करून महाराष्ट्रात नोकरभरती आयोजित करते यावर सरकारचा अंकुश नसल्याची टीका केली. हा गोमंतकीय तरुणांवर होत असलेला अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार सोडून राज्यातील या समस्यांवर लक्ष घालावे. राज्यातील काही खासगी कंपन्या आपल्याला हवी तशी नोकरभरती करत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली होती.

'आरजी'कडून निषेध

वेर्णा येथील इंडिको रेमेडीज कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रात मुलाखती घेण्याच्या निर्णयाचा 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब यांनीही निषेध केला आहे. भाजप सरकारने गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांना विकल्याचा आरोप परब यांनी केला. कंपनीने विविध पदांसाठी २५ रोजी बोईसर-मुंबई येथे मुलाखती ठेवल्या आहेत. कंपनी गोव्यात असताना भरती प्रक्रिया महाराष्ट्रात केल्यावरून परब यांनी टीका केली आहे. सरकारने गोमंतकीय तरुणांना बेरोजगार करण्याचा कट रचल्याचा आरोपही परब यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवा