शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2024 08:25 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडिको रेमेडीज या औषधनिर्मिती कंपनीने प्रकल्पात नोकरभरतीसाठी बोईसर-महाराष्ट्र येथे मुलाखती ठेवल्याने गोव्यात एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या या भरतीविरोधात गोवा फॉरवर्डसह आप, आरजी व काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर कंपनीने मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला.

बुधवारी सायंकाळी कंपनीने ती जाहिरात रद्द केल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. वेर्णा येथील इंडोको रेमेडीज या औषध कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रातील बोईसर येथे मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करताच सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यातील विरोधी पक्षांनी कंपनीसह सरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने शेवटी संबंधित कंपनीने ही नोकरभरती प्रक्रिया रद्द केल्याचे पत्र दिले. 

दरम्यान या मुद्द्यावरून गोवा फॉरवर्ड, आरजी पक्षाने संताप व्यक्त करत राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला.

स्थानिकांना प्राधान्य हवेच

गोमंतकीयांना खासगी उद्योगातील नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण मिळावे यासाठी गोवा फॉरवर्ड वेळोवेळी विधानसभेतही आवाज उठवत आहे. खासगी उद्योगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या न देण्यापासून रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. गोव्यातील युवकांना रोजगारात प्राधान्य देणारी धोरणे सरकारने लागू केली पाहिजेत. तसेच या युवकांना पुरेसे कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

नोकरभरतीवर सरकारचा अंकुश हवा

काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी फार्मा कंपनी गोव्यात प्लांट सुरू करून महाराष्ट्रात नोकरभरती आयोजित करते यावर सरकारचा अंकुश नसल्याची टीका केली. हा गोमंतकीय तरुणांवर होत असलेला अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार सोडून राज्यातील या समस्यांवर लक्ष घालावे. राज्यातील काही खासगी कंपन्या आपल्याला हवी तशी नोकरभरती करत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली होती.

'आरजी'कडून निषेध

वेर्णा येथील इंडिको रेमेडीज कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रात मुलाखती घेण्याच्या निर्णयाचा 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब यांनीही निषेध केला आहे. भाजप सरकारने गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांना विकल्याचा आरोप परब यांनी केला. कंपनीने विविध पदांसाठी २५ रोजी बोईसर-मुंबई येथे मुलाखती ठेवल्या आहेत. कंपनी गोव्यात असताना भरती प्रक्रिया महाराष्ट्रात केल्यावरून परब यांनी टीका केली आहे. सरकारने गोमंतकीय तरुणांना बेरोजगार करण्याचा कट रचल्याचा आरोपही परब यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवा