शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2024 08:25 IST

मुख्यमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडिको रेमेडीज या औषधनिर्मिती कंपनीने प्रकल्पात नोकरभरतीसाठी बोईसर-महाराष्ट्र येथे मुलाखती ठेवल्याने गोव्यात एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या या भरतीविरोधात गोवा फॉरवर्डसह आप, आरजी व काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर कंपनीने मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला.

बुधवारी सायंकाळी कंपनीने ती जाहिरात रद्द केल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. वेर्णा येथील इंडोको रेमेडीज या औषध कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रातील बोईसर येथे मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करताच सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यातील विरोधी पक्षांनी कंपनीसह सरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने शेवटी संबंधित कंपनीने ही नोकरभरती प्रक्रिया रद्द केल्याचे पत्र दिले. 

दरम्यान या मुद्द्यावरून गोवा फॉरवर्ड, आरजी पक्षाने संताप व्यक्त करत राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला.

स्थानिकांना प्राधान्य हवेच

गोमंतकीयांना खासगी उद्योगातील नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण मिळावे यासाठी गोवा फॉरवर्ड वेळोवेळी विधानसभेतही आवाज उठवत आहे. खासगी उद्योगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या न देण्यापासून रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. गोव्यातील युवकांना रोजगारात प्राधान्य देणारी धोरणे सरकारने लागू केली पाहिजेत. तसेच या युवकांना पुरेसे कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

नोकरभरतीवर सरकारचा अंकुश हवा

काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी फार्मा कंपनी गोव्यात प्लांट सुरू करून महाराष्ट्रात नोकरभरती आयोजित करते यावर सरकारचा अंकुश नसल्याची टीका केली. हा गोमंतकीय तरुणांवर होत असलेला अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार सोडून राज्यातील या समस्यांवर लक्ष घालावे. राज्यातील काही खासगी कंपन्या आपल्याला हवी तशी नोकरभरती करत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली होती.

'आरजी'कडून निषेध

वेर्णा येथील इंडिको रेमेडीज कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रात मुलाखती घेण्याच्या निर्णयाचा 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब यांनीही निषेध केला आहे. भाजप सरकारने गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांना विकल्याचा आरोप परब यांनी केला. कंपनीने विविध पदांसाठी २५ रोजी बोईसर-मुंबई येथे मुलाखती ठेवल्या आहेत. कंपनी गोव्यात असताना भरती प्रक्रिया महाराष्ट्रात केल्यावरून परब यांनी टीका केली आहे. सरकारने गोमंतकीय तरुणांना बेरोजगार करण्याचा कट रचल्याचा आरोपही परब यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवा