शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 13:43 IST

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना आता मीच राजकारण शिकवेन, असा आश्वासक सल्ला माजी आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे.

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे. त्यांनी नुसते भाऊ म्हटले म्हणजे मी भाऊ होत नाही. तर ते नाते सांभाळण्याचीही गरज आहे. आता ते हे नाते खरंच सांभाळणार का? हेही त्यांनाच विचारावे, असा टोलाही सोपटे यांनी लगावला.

आमदार जीत आरोलकर हे भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या योजना तसेच विकासकामांचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे भाजपला मते त्यांनी द्यायलाच हवीत. त्यांनी आपल्याला मोठा भाऊ म्हटले आहे. आता मला मोठा भाऊ आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आम्हा दोन्ही भावांमध्ये चांगले नाते आहे. आता जीतही मला भाऊ म्हणत असल्याने त्यांनी ते नाते सांभाळावे, असेही सोपटे म्हणाले.

भावाचे नाते ते सांभाळणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारावे. मी मागील २५ वर्षांपासून राजकारणात आहे. आतापर्यंत चार निवडणूका जिंकल्या आहेत. त्यांना जर माझ्याकडून राजकारण शिकण्याची इच्छा असल्यास मी त्यांना ते शिकवेन. जीतचा भाजप सरकारला पाठिंबा आहे आणि मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत जर भाजपसाठी मते मागायची असल्यास आपण त्यांच्याकडे मते मागूच, असेही सोपटे यांनी नमूद केले.

राजकारण लोक शिकवतात : जीत आरोलकर

एका राजकारण्याला कधी दुसरा राजकारणी राजकारण शिकवत नसतो, तर लोकच शिकवत असतात. अनेकदा निवडणुकीवेळी सामान्य लोकच ते राजकारण व्यवस्थित शिकवतात, अशी प्रतिक्रिया आमदार जीत आरोलकर यांनी काल दिली. सोपटे यांच्या विधानाबाबत बोलताना आरोलकर म्हणाले की, सोपटे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, असे मी अलीकडेच म्हटले होते. म्हणजे मी त्यांना योग्य तो मान दिला होता. मी आमदार आहे व ते माजी आमदार आहेत. मी त्यांच्या वयाचा वगैरे मान राखला होता. मात्र मी मान दिला तरी, समोरच्या व्यक्तीला जर तो स्वीकारता येत नसेल, तर मग त्याविषयी मी अधिक विचार करण्याची गरज राहत नाही. दुसऱ्याला आपण मान द्यायला हवा, असा संस्कार आमच्यावर घरातून झालेला आहे. त्यामुळेच मी सोपटेंना भावाची उपमा देऊन मान दिला; पण तो स्वीकारण्याकडे त्यांचा कल नाही. ते मला राजकारण शिकवण्याची भाषा करतात, असेही आरोलकर म्हणाले. 

वास्तविक मी आणि सोपटे यांनी एकत्र काम करून श्रीपाद नाईक यांना अधिकाधिक मते मांद्रे मतदारसंघातून देण्यावर सगळे लक्ष केंद्रित करायला हवे. मात्र सोपटे यांचे विधान ऐकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. जीतला सर्व सरकारी लाभ मिळतो. सरकार सर्व काही देते, असे विधान सोपटे करतात. आम्हाला भाजपने सरकार घडवताना सोबत घेतले आहे, हे सोपटे विसरतात. दुसऱ्याने दिलेला मान आपण स्वीकारायला हवा, हे सोपटे यांनी अगोदर शिकून घ्यायला नको काय, असा प्रश्न माझ्या मनात येतो. सोपटे यांच्याकडे (एकट्याकडे) मांद्रे मतदारसंघात जर पंधरा हजार मते आहेत, तर मग २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना स्वतःला नऊ हजारच मते का पडली? असा प्रश्न जीतच्या समर्थकांनी केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा