शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 13:43 IST

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना आता मीच राजकारण शिकवेन, असा आश्वासक सल्ला माजी आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे.

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे. त्यांनी नुसते भाऊ म्हटले म्हणजे मी भाऊ होत नाही. तर ते नाते सांभाळण्याचीही गरज आहे. आता ते हे नाते खरंच सांभाळणार का? हेही त्यांनाच विचारावे, असा टोलाही सोपटे यांनी लगावला.

आमदार जीत आरोलकर हे भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या योजना तसेच विकासकामांचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे भाजपला मते त्यांनी द्यायलाच हवीत. त्यांनी आपल्याला मोठा भाऊ म्हटले आहे. आता मला मोठा भाऊ आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आम्हा दोन्ही भावांमध्ये चांगले नाते आहे. आता जीतही मला भाऊ म्हणत असल्याने त्यांनी ते नाते सांभाळावे, असेही सोपटे म्हणाले.

भावाचे नाते ते सांभाळणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारावे. मी मागील २५ वर्षांपासून राजकारणात आहे. आतापर्यंत चार निवडणूका जिंकल्या आहेत. त्यांना जर माझ्याकडून राजकारण शिकण्याची इच्छा असल्यास मी त्यांना ते शिकवेन. जीतचा भाजप सरकारला पाठिंबा आहे आणि मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत जर भाजपसाठी मते मागायची असल्यास आपण त्यांच्याकडे मते मागूच, असेही सोपटे यांनी नमूद केले.

राजकारण लोक शिकवतात : जीत आरोलकर

एका राजकारण्याला कधी दुसरा राजकारणी राजकारण शिकवत नसतो, तर लोकच शिकवत असतात. अनेकदा निवडणुकीवेळी सामान्य लोकच ते राजकारण व्यवस्थित शिकवतात, अशी प्रतिक्रिया आमदार जीत आरोलकर यांनी काल दिली. सोपटे यांच्या विधानाबाबत बोलताना आरोलकर म्हणाले की, सोपटे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, असे मी अलीकडेच म्हटले होते. म्हणजे मी त्यांना योग्य तो मान दिला होता. मी आमदार आहे व ते माजी आमदार आहेत. मी त्यांच्या वयाचा वगैरे मान राखला होता. मात्र मी मान दिला तरी, समोरच्या व्यक्तीला जर तो स्वीकारता येत नसेल, तर मग त्याविषयी मी अधिक विचार करण्याची गरज राहत नाही. दुसऱ्याला आपण मान द्यायला हवा, असा संस्कार आमच्यावर घरातून झालेला आहे. त्यामुळेच मी सोपटेंना भावाची उपमा देऊन मान दिला; पण तो स्वीकारण्याकडे त्यांचा कल नाही. ते मला राजकारण शिकवण्याची भाषा करतात, असेही आरोलकर म्हणाले. 

वास्तविक मी आणि सोपटे यांनी एकत्र काम करून श्रीपाद नाईक यांना अधिकाधिक मते मांद्रे मतदारसंघातून देण्यावर सगळे लक्ष केंद्रित करायला हवे. मात्र सोपटे यांचे विधान ऐकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. जीतला सर्व सरकारी लाभ मिळतो. सरकार सर्व काही देते, असे विधान सोपटे करतात. आम्हाला भाजपने सरकार घडवताना सोबत घेतले आहे, हे सोपटे विसरतात. दुसऱ्याने दिलेला मान आपण स्वीकारायला हवा, हे सोपटे यांनी अगोदर शिकून घ्यायला नको काय, असा प्रश्न माझ्या मनात येतो. सोपटे यांच्याकडे (एकट्याकडे) मांद्रे मतदारसंघात जर पंधरा हजार मते आहेत, तर मग २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना स्वतःला नऊ हजारच मते का पडली? असा प्रश्न जीतच्या समर्थकांनी केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा