शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 13:43 IST

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना आता मीच राजकारण शिकवेन, असा आश्वासक सल्ला माजी आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे.

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे. त्यांनी नुसते भाऊ म्हटले म्हणजे मी भाऊ होत नाही. तर ते नाते सांभाळण्याचीही गरज आहे. आता ते हे नाते खरंच सांभाळणार का? हेही त्यांनाच विचारावे, असा टोलाही सोपटे यांनी लगावला.

आमदार जीत आरोलकर हे भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या योजना तसेच विकासकामांचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे भाजपला मते त्यांनी द्यायलाच हवीत. त्यांनी आपल्याला मोठा भाऊ म्हटले आहे. आता मला मोठा भाऊ आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आम्हा दोन्ही भावांमध्ये चांगले नाते आहे. आता जीतही मला भाऊ म्हणत असल्याने त्यांनी ते नाते सांभाळावे, असेही सोपटे म्हणाले.

भावाचे नाते ते सांभाळणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारावे. मी मागील २५ वर्षांपासून राजकारणात आहे. आतापर्यंत चार निवडणूका जिंकल्या आहेत. त्यांना जर माझ्याकडून राजकारण शिकण्याची इच्छा असल्यास मी त्यांना ते शिकवेन. जीतचा भाजप सरकारला पाठिंबा आहे आणि मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत जर भाजपसाठी मते मागायची असल्यास आपण त्यांच्याकडे मते मागूच, असेही सोपटे यांनी नमूद केले.

राजकारण लोक शिकवतात : जीत आरोलकर

एका राजकारण्याला कधी दुसरा राजकारणी राजकारण शिकवत नसतो, तर लोकच शिकवत असतात. अनेकदा निवडणुकीवेळी सामान्य लोकच ते राजकारण व्यवस्थित शिकवतात, अशी प्रतिक्रिया आमदार जीत आरोलकर यांनी काल दिली. सोपटे यांच्या विधानाबाबत बोलताना आरोलकर म्हणाले की, सोपटे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, असे मी अलीकडेच म्हटले होते. म्हणजे मी त्यांना योग्य तो मान दिला होता. मी आमदार आहे व ते माजी आमदार आहेत. मी त्यांच्या वयाचा वगैरे मान राखला होता. मात्र मी मान दिला तरी, समोरच्या व्यक्तीला जर तो स्वीकारता येत नसेल, तर मग त्याविषयी मी अधिक विचार करण्याची गरज राहत नाही. दुसऱ्याला आपण मान द्यायला हवा, असा संस्कार आमच्यावर घरातून झालेला आहे. त्यामुळेच मी सोपटेंना भावाची उपमा देऊन मान दिला; पण तो स्वीकारण्याकडे त्यांचा कल नाही. ते मला राजकारण शिकवण्याची भाषा करतात, असेही आरोलकर म्हणाले. 

वास्तविक मी आणि सोपटे यांनी एकत्र काम करून श्रीपाद नाईक यांना अधिकाधिक मते मांद्रे मतदारसंघातून देण्यावर सगळे लक्ष केंद्रित करायला हवे. मात्र सोपटे यांचे विधान ऐकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. जीतला सर्व सरकारी लाभ मिळतो. सरकार सर्व काही देते, असे विधान सोपटे करतात. आम्हाला भाजपने सरकार घडवताना सोबत घेतले आहे, हे सोपटे विसरतात. दुसऱ्याने दिलेला मान आपण स्वीकारायला हवा, हे सोपटे यांनी अगोदर शिकून घ्यायला नको काय, असा प्रश्न माझ्या मनात येतो. सोपटे यांच्याकडे (एकट्याकडे) मांद्रे मतदारसंघात जर पंधरा हजार मते आहेत, तर मग २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना स्वतःला नऊ हजारच मते का पडली? असा प्रश्न जीतच्या समर्थकांनी केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा