शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वरसावे येथील नवीन वाहतूक पूलाचे काम पर्यावरण धोरणात अडकणार? सीआरझेड क्षेत्राचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:41 IST

वरसावे येथील वाहतूक बेटावर मुंबई, ठाणे व वसई-विरारहून मोठ्याप्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते.

- राजू काळे 

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या वरसावे येथे नवीन वाहतुक पूलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम आरआरझेड बाधित नसलेल्या क्षेत्रात सुरु असुन सीआरझेड क्षेत्रातील बांधकाम मात्र पर्यावरण धोरणात अडकले आहे. पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच मोठ्या घाईने पूलाचे केलेले भूमीपुजन फसवे ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वरसावे येथील वाहतुक बेटावर मुंबई, ठाणे व वसई-विरारहून मोठ्याप्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. येथून गुजरातला जाण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) १९७६ व २००२ मध्ये अनुक्रमे दोन पदरी दोन वाहतूक पूल बांधले. त्यामुळे हे दोन्ही पूल मुंबई व गुजरातच्या वाहतुकीसाठी महत्वाचे ठरले आहेत. परंतु, गेल्या ६ वर्षांपासून या दोन्ही पूलांच्या दुरुस्तीने डोके वर काढल्याने अनेकदा त्यावरील वाहतुक बंद केली जाते. यामुळे पूलाच्या तिन्ही बाजूंस वाहतुक कोंडी होऊन तासन्तास वाहतुक खोळंबते. याला पर्याय म्हणून राज्य व केंद्र सरकारने नवीन व तिसरा चार पदरी वाहतुक पूल साकारण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमीपूजन १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या नियोजित वाहतुक पूलाचे बांधकाम २४ ऐवजी १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश सर्व सरकारी यंत्रणांना दिले. हा पूल येथील घोडबंदर नदीवर बांधण्यात येणार असुन नदीच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणात तिवरक्षेत्र आहे. त्यामुळे नदीतील बांधकामासह तिवरक्षेत्रातील बांधकामासाठी पर्यावरण विभागाची परवानगी अत्यावश्यक ठरली आहे. मात्र ती न घेताच पूलाचे भूमीपुजन उरकण्यात आले.

सध्या या पूलाचे बांधकाम सीआरझेड बाधित नसलेल्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. या पूलाच्या बांधकामाची १८ महिन्यांच्या मुदतीपैकी १२ महिने संपुष्टात आले आहेत. उर्वरीत ६ महिन्यांत तो कसा काय पुर्ण होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. एनएचएआयने सीआरझेड बाधित क्षेत्रातील बांधकामाच्या परवानगीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असला तरी ती अद्याप लालफितीत अकडली आहे. त्यामुळे या पूलाचे घाईघाईने केलेले भूमीपुजन फसवे ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

 

या पूलाचे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात होण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु, ठाणे व पालघरचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान अद्याप तयार झालेला नाही. हा प्लान तयार झाल्यानंतर त्या क्षेत्रातील परवानगीची कार्यवाही सुरू होणार आहे. परवानगी मिळताच बांधकामाला गती देण्यात येईल.

- दिनेश अग्रवाल, एनएचएआचे व्यवस्थापक

हा पूल सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येणार असल्याची कल्पना असतानाही त्यासाठी पर्यावरण विभागाची अगोदरच परवानगी घेण्याची आवश्यकता होती. तसे न करताच भूमीपुजन उरकण्यात येऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे बांधण्यात आलेले दोन पूल अपुरे ठरत असताना त्याची सततची दुरुस्ती मोहिम वाहतुक कोंडीची डोकेदुखी ठरत आहे. ती सुसह्य व्हावी, यासाठी श्रमजीवीने एनएचएआय कार्यालयावर निदर्शने केली. पूलाचे काम सरकारी यंत्रणेकडूनच होत असताना सरकारच्याच पर्यावरण विभागाकडून परवानगी दिली जात नसेल तर ते दुर्दैवी आहे. 

- विवेक पंडीत,  श्रमजीवी संघटनेचे संस्थापक

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी