शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बिहारचे राज्यपाल गोव्याचे मुख्यमंत्री होणार? समर्थकांना विश्वास; RSS चा जोरदार पाठिंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2024 07:46 IST

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आल्यास बिहारचे राज्यपाल तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच त्यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे अजून कोणताही प्रस्ताव पोहोचलेला नाही किंवा याबाबतीत पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे काही बोललेले नाहीत. मात्र, आर्लेकर यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव आल्यास राजेंद्र आर्लेकर तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला बहुतांश मंत्री व आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे.

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून ही जागा रिकामी करावी, बिहारमध्ये राज्यपाल असलेले गोमंतकीय सुपुत्र माजी सभापती तथा माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांना गोव्यात आणून मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे द्यावे व नंतर पेडणेहून त्यांना निवडून आणावे, असा प्रस्ताव भाजपच्या एका गटाने दिल्लीपर्यंत पोहोचवला होता. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेऊन प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले होते. परंतु, प्रवीण दिल्लीला गेले नसल्याची माहिती मिळते.

सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्याच आठवड्यात गोवा मुक्तिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर राजकीय चर्चेला गोव्यात उधाण आले. नंतर नेतृत्वपदासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे नाव पुढे आणण्यात आले.

राज्यात सध्या नोकऱ्या विक्री, भू-बळकाव ) प्रकरणातील कुख्यात संशयित सुलेमानचे कोठडीतून पलायन तसेच पोलिस, गुन्हेगार व राजकारण्यांमधील संगनमताचे प्रकरण गाजत आहे. सरकार यामुळे टीकेचे धनी बनले आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी जीत आरोलकर, दाजी साळकर व प्रेमेंद्र शेट या तीन आमदारांना सोबत घेऊन चार्टर विमानाने केलेला राजस्थान दौरा बराच गाजला. दुसरीकडे आर्लेकर यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे.

३० रोजी होणार पुन्हा चर्चा

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गेल्या काही दिवसांत गोव्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतलेला आहे. अनेक मंत्री, आमदार त्यांना भेटले आहेत. आता येत्या ३० रोजी भाजपची महत्त्वाची बैठक दिल्लीत होत असून, त्यावेळी गोव्यातील विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रवीण आर्लेकर नॉट रिचेबल

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठीनी आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिल्लीला बोलावले होते. परंतु ते गेले नाहीत अशी माहिती मिळते. रविवारी दिवसभर त्यांनी फोन कॉलही स्वीकारले नाहीत. त्यानंतर फोन स्विच ऑफ करून ते 'नॉट रिचेबल' होते. प्रवीण यांना आमदारकीचा राजीनामा देण्यास सांगण्यात येणार असल्याच्या वृत्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

अजून कोणताही प्रस्ताव नाही : राजेंद्र आर्लेकर

'लोकमत'ने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्याकडे अजून तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा पक्षश्रेष्ठी वगैरे माझ्याशी काही बोललेलेही नाहीत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास स्वीकारणार काय, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, अजून कोणताच प्रस्ताव नाही. त्यामुळे त्या नंतरच्या गोष्टी आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ