शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेती उपसा प्रकरण : नदीतून गस्ती का नाहीत? खंडपीठाचे खाण खात्यावर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 22:21 IST

बेकायदेशीर  रेती उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारी पथक निष्प्रभ ठरल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून खाण खात्यावर कठोर ताशेरे ओढले आहेत.

 पणजी - बेकायदेशीर  रेती उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारी पथक निष्प्रभ ठरल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून खाण खात्यावर कठोर ताशेरे ओढले आहेत. अंमलबजावणीच्या बाबतीत मंगळवारपर्यंत खात्याने काय केले याची माहिती बुधवारपर्यंत न्यायालयात देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

तेरेखोल नदीसह गोव्यात इतर ठिकाणी चाललेल्या बेकायदेशीर रेती उपसा रोखण्याची मागणी  रेन्बो वॉरीयर्स व इतरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम एन जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारीपथक निष्प्रभ ठरल्याचे याचिकादाराच्या वकिलाकडून न्यायालयात सांगण्यात आले. या बाबतीत खंडपीठाने  भरारी पथकाच्या स्थापनेविषयी विचारले तेव्हा पेडणे बार्देश, तीसवाडी, सत्तरी आणि फोंडा या तालुक्यात भरारी पथके करण्यात आल्याचे सरकारी वकिलाने सांगितले.  कामाची माहिती विचारली तेव्हा अद्याप नदीतून पाहाणी होत नाही असे आढळून आले. त्यामुळे खंडपीठाने खात्यावर तीव्र ताशेरे ओढले.  भरारी पथक केवळ रस्त्यावरून पाहाणी करते. रेती उपसा हा नदीत होतो. नदीतून गस्ती घालण्यासाठी भरारी पथकाकडे बोटी नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे भरारी पथके ही कमकुवत व अकार्यक्षम बनली आहेत. खंडपीठाने यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली. संध्याकाळी पुन्हा या प्रकरणात विशेष सुनावणी ठेवली व त्यावेळी खाण खात्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. कॅप्टन आॅफ पोर्ट आणि कोस्टगार्डकडे फ्लाईंग स्कवॉडसाठी गस्ती बोटी मागितल्याची माहिती खाण खात्यातर्फे संध्याकाळी न्यायालयात देण्यात आली. त्यावेळी बुधवारपर्यंत अंमलबजावणीसंबंधी अहवाल न्यायालयात देण्याचा आदेश खंडपीठाने दिला. 

भरारी पथके कराबेकायदेशीर रेती उपसा रोखण्यासाठी त्वरित अंमलबजावणी पथके किंवा भरारी पथकांची निर्मिती करण्याचा आदेश न् यायालयाने दिला. ज्या ठिकाणी अशी पथके अहेत ती सक्षम करा आणि ज्या ठिकाणी नाहीत तिथे नव्याने स्थापन करा असा आदेश देण्यात आला असा आदेश देण्यात आला. भरारी पथके स्थापन करण्याचा आदेश हा २०१३ मध्ये देण्यात आला होता.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय