शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

बेकायदा बांधकामे का वाढली? गोव्यातील न्यायालयांत खटले गाजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2024 07:30 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल.

अलीकडे गोव्यातील विविध न्यायालयांत बेकायदा बांधकामांविषयीचे खटले गाजू लागले आहेत. बांधकामे पाडा, असे आदेश न्यायालयांना द्यावे लागत आहेत. मुळात छोट्याशा गोव्यात बेकायदा बांधकामे का वाढत आहेत, याचा सरकारने शोध घेण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने मुळापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायती, पालिका व कोमुनिदाद संस्था यांची जबाबदारी याप्रकरणी मोठी आहे. लोकांची बेकायदा घरे किंवा अन्य बांधकामे उभी होईपर्यंत सरकारी यंत्रणा गप्प राहते. अनेकदा कोमुनिदाद संस्था किंवा सरपंच, पंच यांचा बेकायदा बांधकामाशी निगडीत व्यवहाराशी संबंध असतो. किनारी भागातील काही पंच माफिया झाले आहेत, बेकायदा बांधकामाची सुरुवात ही काही सरपंच, उपसरपंच किंवा सचिवांच्या आशीर्वादानेच होते, असा अनुभव किनारपट्टीत येतो. हे कुठे तरी थांबवावे लागेल. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. हरमल किनाऱ्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश अलीकडे न्यायालयास द्यावा लागला. त्यानंतर हणजूणच्या किनारी भागातील ३८ बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास द्यावा लागला आहे. येत्या सात दिवसांत ती बांधकामे पाडा, असे न्यायालयाने बजावले आहे. हा आदेश कालच्या सोमवारी आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका पंचायत सचिवाने न्यायालयाची दिशाभूल केली. बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाई न करता, कारवाई केल्याचे खोटेच सांगितले, हा सगळाच प्रकार संतापजनक आहे. न्यायालयासमोर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यापर्यंत सचिवाची, एका माजी सरपंचाची मजल कशी जाते, गोव्यात पूर्वी असे कधी घडत नव्हते. सगळी सरकारी यंत्रणा व काही लोकप्रतिनिधीही खूप जाड कातडीचे झाले आहेत, असा याचा अर्थ होतो. राज्याची किनारपट्टी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे काही पंचायती तसेच आमदार, मंत्र्यांना वाटते. 

पूर्वी काही सरपंचांना बेकायदा बांधकामांबाबत अपात्रही व्हावे लागले आहे. किनारी भागात मच्छिमारांनी छोटी झोपडी उभी केली तरी नोटीस जाते. मात्र, दिल्लीसह अन्य भागातील बिल्डर्स गोव्याची किनारपट्टी अक्षरश: ओरबाडत आहेत. सीआरझेडचे उल्लंघन करून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्हिला आणि अन्य बांधकामे केली जात आहेत. धनिकांची बांधकामे पंचायती किंवा पालिका मोडत नाहीत. पंचायत संचालनालयाकडे तक्रार केल्यानंतरही केवळ सुनावण्या घेण्याचे नाटक केले जाते. काही बीडीओ, उपजिल्हाधिकारी डोळ्यांना पाणी लावल्यासारखे वरवरची कारवाई करतात. त्याविषयीच्या मोठ्या बातम्याही झळकतात, पण, प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. किनारपट्टीत अतिक्रमणे करून बांधकामे उभी करणारे बड़े मासे अनेकदा मोकळे सुटतात, कायदा हा गरिबांसाठीच असतो, गर्भश्रीमंतांसाठी नाही, असा अनुभव काही प्रकरणांमध्ये येत आहे.

मुंडकारांना न्याय देण्याची भाषा अलीकडे मुख्यमंत्री वारंवार करतात. त्यांना तीनशे चौरस मीटर जागा दिली जाईल, घर मुंडकारांच्या नावावर केले जाईल, वगैरे, गेल्या महिनाभरात काही मुंडकार खटले निकालीही निघाले. मात्र, किती गरीब मुंडकार घरांचे मालक झाले, कितीजणांना जमिनीची मालकी मिळाली, हे येत्या विधानसभा अधिवेशनात जाहीर करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवले तर बरे होईल. पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी पंचायत कायद्यात बदल करू, अशाही घोषणा पूर्वी केल्या आहेत. बांधकामासाठीची प्रक्रिया सुलभ केली, असेही दावे सरकार करत आहे. 

एखाद्याने बांधकाम करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ठरावीक दिवसात जर पंचायतीने परवाना दिला नाही तर बीडीओ त्याविषयी अर्जदाराला न्याय देऊ शकतात, अशी तरतूद मध्यंतरी सरकारने केली आहे. आतापर्यंत या तरतुदीच्या आधारे किती अर्जदारांना न्याय मिळाला तेही सरकारने येत्या अधिवेशनात स्पष्ट करावे, किनारी भागातील अतिक्रमणे किंवा कोमुनिदाद जमिनींवरील अतिक्रमणे हा वेगळा विषय आहे. पण, जे लोक स्वतःच्या खासगी जागेत घर बांधतात, त्यांचीदेखील पंचायती अडवणूक करणार असतील तर बेकायदा बांधकामे वाढतील, हे दुष्टचक्र थांबवावे लागेल,

 

टॅग्स :goaगोवा