शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामे का वाढली? गोव्यातील न्यायालयांत खटले गाजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2024 07:30 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल.

अलीकडे गोव्यातील विविध न्यायालयांत बेकायदा बांधकामांविषयीचे खटले गाजू लागले आहेत. बांधकामे पाडा, असे आदेश न्यायालयांना द्यावे लागत आहेत. मुळात छोट्याशा गोव्यात बेकायदा बांधकामे का वाढत आहेत, याचा सरकारने शोध घेण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने मुळापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायती, पालिका व कोमुनिदाद संस्था यांची जबाबदारी याप्रकरणी मोठी आहे. लोकांची बेकायदा घरे किंवा अन्य बांधकामे उभी होईपर्यंत सरकारी यंत्रणा गप्प राहते. अनेकदा कोमुनिदाद संस्था किंवा सरपंच, पंच यांचा बेकायदा बांधकामाशी निगडीत व्यवहाराशी संबंध असतो. किनारी भागातील काही पंच माफिया झाले आहेत, बेकायदा बांधकामाची सुरुवात ही काही सरपंच, उपसरपंच किंवा सचिवांच्या आशीर्वादानेच होते, असा अनुभव किनारपट्टीत येतो. हे कुठे तरी थांबवावे लागेल. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. हरमल किनाऱ्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश अलीकडे न्यायालयास द्यावा लागला. त्यानंतर हणजूणच्या किनारी भागातील ३८ बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास द्यावा लागला आहे. येत्या सात दिवसांत ती बांधकामे पाडा, असे न्यायालयाने बजावले आहे. हा आदेश कालच्या सोमवारी आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका पंचायत सचिवाने न्यायालयाची दिशाभूल केली. बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाई न करता, कारवाई केल्याचे खोटेच सांगितले, हा सगळाच प्रकार संतापजनक आहे. न्यायालयासमोर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यापर्यंत सचिवाची, एका माजी सरपंचाची मजल कशी जाते, गोव्यात पूर्वी असे कधी घडत नव्हते. सगळी सरकारी यंत्रणा व काही लोकप्रतिनिधीही खूप जाड कातडीचे झाले आहेत, असा याचा अर्थ होतो. राज्याची किनारपट्टी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे काही पंचायती तसेच आमदार, मंत्र्यांना वाटते. 

पूर्वी काही सरपंचांना बेकायदा बांधकामांबाबत अपात्रही व्हावे लागले आहे. किनारी भागात मच्छिमारांनी छोटी झोपडी उभी केली तरी नोटीस जाते. मात्र, दिल्लीसह अन्य भागातील बिल्डर्स गोव्याची किनारपट्टी अक्षरश: ओरबाडत आहेत. सीआरझेडचे उल्लंघन करून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्हिला आणि अन्य बांधकामे केली जात आहेत. धनिकांची बांधकामे पंचायती किंवा पालिका मोडत नाहीत. पंचायत संचालनालयाकडे तक्रार केल्यानंतरही केवळ सुनावण्या घेण्याचे नाटक केले जाते. काही बीडीओ, उपजिल्हाधिकारी डोळ्यांना पाणी लावल्यासारखे वरवरची कारवाई करतात. त्याविषयीच्या मोठ्या बातम्याही झळकतात, पण, प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. किनारपट्टीत अतिक्रमणे करून बांधकामे उभी करणारे बड़े मासे अनेकदा मोकळे सुटतात, कायदा हा गरिबांसाठीच असतो, गर्भश्रीमंतांसाठी नाही, असा अनुभव काही प्रकरणांमध्ये येत आहे.

मुंडकारांना न्याय देण्याची भाषा अलीकडे मुख्यमंत्री वारंवार करतात. त्यांना तीनशे चौरस मीटर जागा दिली जाईल, घर मुंडकारांच्या नावावर केले जाईल, वगैरे, गेल्या महिनाभरात काही मुंडकार खटले निकालीही निघाले. मात्र, किती गरीब मुंडकार घरांचे मालक झाले, कितीजणांना जमिनीची मालकी मिळाली, हे येत्या विधानसभा अधिवेशनात जाहीर करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवले तर बरे होईल. पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी पंचायत कायद्यात बदल करू, अशाही घोषणा पूर्वी केल्या आहेत. बांधकामासाठीची प्रक्रिया सुलभ केली, असेही दावे सरकार करत आहे. 

एखाद्याने बांधकाम करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ठरावीक दिवसात जर पंचायतीने परवाना दिला नाही तर बीडीओ त्याविषयी अर्जदाराला न्याय देऊ शकतात, अशी तरतूद मध्यंतरी सरकारने केली आहे. आतापर्यंत या तरतुदीच्या आधारे किती अर्जदारांना न्याय मिळाला तेही सरकारने येत्या अधिवेशनात स्पष्ट करावे, किनारी भागातील अतिक्रमणे किंवा कोमुनिदाद जमिनींवरील अतिक्रमणे हा वेगळा विषय आहे. पण, जे लोक स्वतःच्या खासगी जागेत घर बांधतात, त्यांचीदेखील पंचायती अडवणूक करणार असतील तर बेकायदा बांधकामे वाढतील, हे दुष्टचक्र थांबवावे लागेल,

 

टॅग्स :goaगोवा