शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

बेकायदा बांधकामे का वाढली? गोव्यातील न्यायालयांत खटले गाजू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2024 07:30 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल.

अलीकडे गोव्यातील विविध न्यायालयांत बेकायदा बांधकामांविषयीचे खटले गाजू लागले आहेत. बांधकामे पाडा, असे आदेश न्यायालयांना द्यावे लागत आहेत. मुळात छोट्याशा गोव्यात बेकायदा बांधकामे का वाढत आहेत, याचा सरकारने शोध घेण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने मुळापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायती, पालिका व कोमुनिदाद संस्था यांची जबाबदारी याप्रकरणी मोठी आहे. लोकांची बेकायदा घरे किंवा अन्य बांधकामे उभी होईपर्यंत सरकारी यंत्रणा गप्प राहते. अनेकदा कोमुनिदाद संस्था किंवा सरपंच, पंच यांचा बेकायदा बांधकामाशी निगडीत व्यवहाराशी संबंध असतो. किनारी भागातील काही पंच माफिया झाले आहेत, बेकायदा बांधकामाची सुरुवात ही काही सरपंच, उपसरपंच किंवा सचिवांच्या आशीर्वादानेच होते, असा अनुभव किनारपट्टीत येतो. हे कुठे तरी थांबवावे लागेल. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. हरमल किनाऱ्यावरील बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश अलीकडे न्यायालयास द्यावा लागला. त्यानंतर हणजूणच्या किनारी भागातील ३८ बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास द्यावा लागला आहे. येत्या सात दिवसांत ती बांधकामे पाडा, असे न्यायालयाने बजावले आहे. हा आदेश कालच्या सोमवारी आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका पंचायत सचिवाने न्यायालयाची दिशाभूल केली. बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाई न करता, कारवाई केल्याचे खोटेच सांगितले, हा सगळाच प्रकार संतापजनक आहे. न्यायालयासमोर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यापर्यंत सचिवाची, एका माजी सरपंचाची मजल कशी जाते, गोव्यात पूर्वी असे कधी घडत नव्हते. सगळी सरकारी यंत्रणा व काही लोकप्रतिनिधीही खूप जाड कातडीचे झाले आहेत, असा याचा अर्थ होतो. राज्याची किनारपट्टी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे काही पंचायती तसेच आमदार, मंत्र्यांना वाटते. 

पूर्वी काही सरपंचांना बेकायदा बांधकामांबाबत अपात्रही व्हावे लागले आहे. किनारी भागात मच्छिमारांनी छोटी झोपडी उभी केली तरी नोटीस जाते. मात्र, दिल्लीसह अन्य भागातील बिल्डर्स गोव्याची किनारपट्टी अक्षरश: ओरबाडत आहेत. सीआरझेडचे उल्लंघन करून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्हिला आणि अन्य बांधकामे केली जात आहेत. धनिकांची बांधकामे पंचायती किंवा पालिका मोडत नाहीत. पंचायत संचालनालयाकडे तक्रार केल्यानंतरही केवळ सुनावण्या घेण्याचे नाटक केले जाते. काही बीडीओ, उपजिल्हाधिकारी डोळ्यांना पाणी लावल्यासारखे वरवरची कारवाई करतात. त्याविषयीच्या मोठ्या बातम्याही झळकतात, पण, प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. किनारपट्टीत अतिक्रमणे करून बांधकामे उभी करणारे बड़े मासे अनेकदा मोकळे सुटतात, कायदा हा गरिबांसाठीच असतो, गर्भश्रीमंतांसाठी नाही, असा अनुभव काही प्रकरणांमध्ये येत आहे.

मुंडकारांना न्याय देण्याची भाषा अलीकडे मुख्यमंत्री वारंवार करतात. त्यांना तीनशे चौरस मीटर जागा दिली जाईल, घर मुंडकारांच्या नावावर केले जाईल, वगैरे, गेल्या महिनाभरात काही मुंडकार खटले निकालीही निघाले. मात्र, किती गरीब मुंडकार घरांचे मालक झाले, कितीजणांना जमिनीची मालकी मिळाली, हे येत्या विधानसभा अधिवेशनात जाहीर करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवले तर बरे होईल. पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी पंचायत कायद्यात बदल करू, अशाही घोषणा पूर्वी केल्या आहेत. बांधकामासाठीची प्रक्रिया सुलभ केली, असेही दावे सरकार करत आहे. 

एखाद्याने बांधकाम करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ठरावीक दिवसात जर पंचायतीने परवाना दिला नाही तर बीडीओ त्याविषयी अर्जदाराला न्याय देऊ शकतात, अशी तरतूद मध्यंतरी सरकारने केली आहे. आतापर्यंत या तरतुदीच्या आधारे किती अर्जदारांना न्याय मिळाला तेही सरकारने येत्या अधिवेशनात स्पष्ट करावे, किनारी भागातील अतिक्रमणे किंवा कोमुनिदाद जमिनींवरील अतिक्रमणे हा वेगळा विषय आहे. पण, जे लोक स्वतःच्या खासगी जागेत घर बांधतात, त्यांचीदेखील पंचायती अडवणूक करणार असतील तर बेकायदा बांधकामे वाढतील, हे दुष्टचक्र थांबवावे लागेल,

 

टॅग्स :goaगोवा