शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

"गोव्यात सर्वच माणसे तुमच्या सारखी का नाहीत?"; मल्याळी तरूणाला वाईट अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:58 IST

काणकोण तालुक्यातील लोलये गावात पोहोचला. तेथील काही लोकांनी त्याला अडवून त्याची विचारपूस केली.

- वासुदेव पागी 

 

पणजीः मुंबईहून   आपल्या घरी जाण्यास निघालेला केरळी युवक पुढे ट्रेन नसल्यामुळे गोव्यातच अडकून पडला. अडलेल्यांना मदत करणे हे आपले गोंयकारपण, परंतु त्याला मारहाण करण्यापासून त्याचा मोबाईल व पैसे काढून घेण्यापर्यंतची अमानूषता त्याच्या पदरी पडली. मात्र राज्याच्या सीमेवरील लोलये वासियांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तो भाउक झाला.

या युवकाचे नाव ऊन्नीकृष्णन असे असून तो केरळचा आहे. मुंबईला तो गेला होता. तेथून ट्रेन पकडून तो केरळला जायला निघाला होता. परंतु ट्रेन मडगावच्या पुढे गेली नाही. तसेच नंतर रेल्वेसेवाही बंद करण्यात आल्यामुळे तो तिथेच अडकून पडला. मडगाव येथे तो 20 दिवस राहिला. तेथून तो चालत कारवारच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे पैसे  व मोबाईल ही काढून घेण्यात आला.

त्याही परिस्थितीत तो चालत राहिला. काणकोण तालुक्यातील लोलये गावात पोहोचला. तेथील काही लोकांनी त्याला अडवून त्याची विचारपूस केली. त्याला मल्याळम शिवाय इतर भाषा फारच अल्प येत असल्यामुळे त्याच्याशी संवाद करणेही कठीण होत होते.  तो बराच दिवस उपाशीच होता असे आढळून आले.  स्थानिक माजी सरपंच अजय लोलयेकर व राजेश  नाईक, स्थानिक श्री दामोदर विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर आणि शिक्षक अनिल कामत यांनी त्याची काही खाण्यापीण्याची व्यवस्था केली. त्याला थोडे पैसेही दिले व नंतर पोलीसांना माहिती देवून त्यांच्या स्वाधीन केले.  गोव्यातील सर्वच माणसे लोलयेवासियांसारखी असती तर त्या बिचाऱ्याला हे हाल सोसावे लागले नसते असे त्याला नेण्यासाठी आलेले पोलीसही बोलून गेले. त्याची निवारा घरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची पोलीसांनी माहिती दिली.