शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

म.गो.पक्ष का फोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2024 08:31 IST

ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत बलवान होतो तेव्हा तेव्हा तो मित्रपक्षांना हादरे देतो. हे महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे व अन्य राज्यांतही. काल म.गो.च्या एका प्रमुख सदस्याला भाजपने आपल्या पक्षात घेऊन मगोप नेतृत्वाला पहिला धक्का दिला. 

अर्थात, कालचा धक्का सौम्य असला तरी, मगो पक्षनेतृत्वाला त्यातून योग्य तो संदेश भाजपने पाठवला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर गोव्यात मगो पक्षाचे काय होऊ शकते, त्याची ही झलक आहे असे राजकीय विश्लेषक मानतात. धारबांदोड्याचे सरपंच बालाजी गावस हे मगो पक्षाचे सक्रिय सदस्य होते. प्रमुख कार्यकर्ते होते. ते गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सावर्डे मतदारसंघात मगोपचे उमेदवार होते. मंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी त्यांना गेल्या निवडणुकीवेळी बरेच प्रोत्साहन दिले होते. मात्र ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

मगो पक्षाच्या नेतृत्वाला पूर्णपणे अंधारात ठेवून ही खेळी खेळण्यात आली आहे. यामुळे मगो पक्षाच्या केंद्रीय समितीला धक्का बसलाच, शिवाय मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरही हादरले आहेत. भाजपने अशी खेळी का खेळली असावी, याचे उत्तर ते शोधत आहेत. भाजपचा आयात संस्कृतीवर प्रचंड विश्वास आहे. 

उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना आयात करण्याचे धोरण देशभर सुरू आहे. गोव्याच्या भाजप केडरलाही आता या धोरणाची सवय झाली आहे. दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांना तिकीट दिल्यापासून सगळी पालखी सदानंद तानावडे व मुख्यमंत्री सावंत यांनाच उचलावी लागत आहे. पल्लवी भाजपच्याच आहेत, कालपरवा आलेल्या नाहीत, असे लोकांना सांगताना भाजपचे नेते थकत नाहीत. बाबू कवळेकर, दामू नाईक, नरेंद्र सावईकर वगैरे पालखीमागील वारकऱ्यांच्या यात्रेत मुकाट्याने सहभागी झाले आहेत. दक्षिण गोव्यातील हिंदू बहुजन समाज सध्या निवडणुकीचे विविध अर्थ लावत आहे. म.गो. भाजपसोबत सत्तेत आहे. भाजपचा मित्रपक्ष असल्याने मगोपच्या नेतृत्वाला वाटले होते की- आपला पूर्वीचा उमेदवार यावेळी भाजप पळवणार नाही. मात्र तो समज काल खोटा ठरला, गावस यांनी गुडबाय केल्यानंतर मगोला आता बाकीचे प्रमुख सदस्य किंवा गेल्यावेळचे उमेदवार सांभाळून ठेवावे लागतील.

काँग्रेस किंवा आरजी किंवा अन्य विरोधी पक्षांमधील जर कुणाला भाजपने फोडले असते तर मगोपला चिंतेचे कारण नव्हते. मात्र बालाजींनाच भाजपने गळाला लावल्यानंतर मगोपची चिंता वाढली. वास्तविक मगोच्या समर्थकांची मते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपलाच मिळणार आहेत. कारण सुदिन ढवळीकर यांनी मगो यावेळी दक्षिणेत ४५ हजार मते भाजपला देईल असे म्हटले होते. ढवळीकर यांनी गेल्याच आठवड्यात असे विधान केल्यानंतर भाजपने दोन पावले आणखी पुढे टाकली व आतापासूनच मगोपच्या सदस्यांना आपल्या काखोटीला मारण्याचे काम सुरू केले. मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर हेही मनाने पक्षासोबत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याची कल्पना आहेच. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जीत आरोलकर यांनाही भाजप आपल्या पक्षात तर घेणार नाही ना?

गेल्यावेळी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपने फोडले होते. माजी मंत्री दीपक पाऊसकर यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रस्ताव आहेच. दीपक पाऊसकर अपक्षच असल्याने ते भाजपमध्ये गेले तरी, त्यात मगोपचे नुकसान नाही. मात्र दीपकपूर्वीच बालाजी यांना भाजपने पावन करून घेतले. सावर्डे, कुडचडे किंवा फोंडा तालुक्यात अन्य जे कुणी मगोपचे खंदे सदस्य आहेत, त्यांनादेखील गळाला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. डिचोलीचे नरेश सावळ यांनी अलीकडेच मगो पक्ष सोडला. भाजपला तूर्त सावळ नकोत, कारण डिचोलीत आमदार चंद्रकांत शेट्ये यांना डिस्टर्ब न करण्याचा भाजपचा विचार असावा, फोंड्याचे केतन भाटीकर यांनादेखील यापुढील काळात भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जाऊ शकते.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात आणि देशातही अनेक छोट्या पक्षांच्या अस्तित्वाची कसोटी लागणार आहे, मगो पक्ष शिल्लक राहील की नाही, हे काळच ठरवील. 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Politicsराजकारण