शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

गोव्यात गणेशोत्सवात प्रदूषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 21:33 IST

देशाच्या पश्चिम किना-यावर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यात गोव्याचाही समावेश असून, येथे या उत्सवात पर्यावरणाला अपायकारक वस्तूंचा होणा-या अपरिमित वापरामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे.

विलास ओहाळपणजी, दि. 23 - देशाच्या पश्चिम किना-यावर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यात गोव्याचाही समावेश असून, येथे या उत्सवात पर्यावरणाला अपायकारक वस्तूंचा होणा-या अपरिमित वापरामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. जल, वायू, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायदे असले तरी या काळात त्याची अंमलबजावणी नक्की कोणी करायची हा प्रश्न अनुत्तरीच राहतो.

दिवसेंदिवस गणेशोत्सवातील प्रदूषणावर जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारपासून अनेक सामाजिक संस्था जागृती करतात. तरीही पाणी प्रदूषण करणा-या प्लास्टर आॅफ परिसच्या गणेशमूर्ती खरेदी केल्याच जातात. राज्यात २००८ मध्ये कायद्याने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती विक्रीवर बंदी घातली, तरीही त्यांना मागणी असल्याने लोक या मूर्ती आणून विकतातच. चिकणमाती आणि मातीच्या मूर्ती खरेदी करा, म्हणून सरकार सांगते, प्रर्यावरणप्रेमी सांगतात. त्यासाठी गोवा हस्तकला महामंडळ लोकांना स्वस्तात मूर्ती मिळावी, म्हणून त्या स्थानिक कुंभारांकडून विकत घेऊन लोकांसाठी महामंडळ मूर्ती उपलब्ध करून देते. त्याशिवाय मिरवणुकीत विसर्जनावेळी फटाक्यांची अमाप आतषबाजी करणे, कर्णकर्कश आवाजाचे ध्वनीक्षेपक लावून ध्वनी प्रदूषण करणे, पर्यावरणास मारक असलेल्या थर्मोकोलचा वापर करणे, अशा गोष्टी सातत्याने होत आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिका-याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत चिकणमातीच्या मूर्तीमध्ये किंचीतसे प्रमाण अपायकारक असतात. मात्र, २०१४-१५ च्या अहवालात जलप्रदूषण झालेच नसल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या सीमाभागातील लोक मात्र, पीओपीच्या मूर्ती या कोल्हापूर आणि कर्नाटकातून येत असल्याचे सांगतात.देशात सर्वत्रच १९८६ च्या कायद्याचे पालन होताना अजिबात दिसत नाही. गोव्यात होणाºया जलप्रदूषण विरोधात या कायद्याची सरकारने डोळसपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात सरकारने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली असली, तर त्या गोव्यात येतात कशा हा प्रश्न आहेच. पण लोकांचीही जबाबदारी असून, त्यांनीच त्या वापरावर बंदी घालावी. विसर्जनावेळी निर्माल्य विल्हेवाटीचे व्यवस्थापन केले जात नाही, त्यामुळे नदी, ओढे आणि तळ्यांचे प्रदूषण झालेले दिसून येते.- राजेंद्र केरकर, पर्यावरण कार्यकर्तेजल किंवा हवा प्रदूषण असो, येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्याबाबतीत कारवाई करते. अशा सणावेळी हे मंडळ कारवाई करणे टाळतेच. कायदे हे कागदावर आहेत. राज्यात ‘आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी स्थिती आहे. राज्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणपती आत्ताच येत नाहीत, त्या कित्येक वर्षांपासून येतात. याविरुद्ध कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जर कायदा पाळण्याची इच्छा मूळत: लोकांमध्येच असेल, तरच प्रदूषण थांबेल आणि पीओपी मूर्ती वापरावर बंदी येईल.- रमेश गावस, सामाजिक कार्यकर्ते.सध्या दिखाऊपणा करण्यात मोठी चढाओढ दिसून येते. त्यासाठी निसर्गाला बाधक वस्तूंचा वापर अधिक होतो. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती कमी किंमतीत उपलब्ध होतात, म्हणून खरेदी केल्या जातात. पण मातीची मूर्ती लहान असेल तर बिघडते कुठे हा प्रश्न लोक स्वत:च्या मनाला का करीत नाहीत. कायद्याने किती गोष्टी साध्य होतात, त्यासाठी लोकांनी प्रदूषणाबाबत सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. कर्तव्य म्हणून लोकांनी जल, वायू प्रदूषण करणार नाही, असे बंधन स्वत:वर घालून घेतले तरच ते शक्य आहे.-प्रवीण सबणीस, सामाजिक कार्यकर्ते.