शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

सर्वपक्षीय शिष्टमंडळ कुणासाठी नेता? कॉंग्रेस आमदाराची स्वपक्षियांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 22:28 IST

खाण मालकांसाठी दिल्लीत सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ पाठविण्याचे कारण काय असा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला असून या शिष्टमंडळाचा घटक बनण्यास त्यांने विरोध दर्शविला आहे. 

पणजी - जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यातील खाणी या सार्वजनिक मालमत्ता ठरतात तेव्हा खाण मालकांसाठी दिल्लीत सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ पाठविण्याचे कारण काय असा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला असून या शिष्टमंडळाचा घटक बनण्यास त्यांने विरोध दर्शविला आहे. 

दिल्लीत शिष्टमंडळ घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांना आणि त्यात विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह कॉंग्रेसच्याच आमदारांनाही त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. या आमदारांना खाण प्रकरणातील नेमका प्रस्ताव काय आहे याची माहिती आहे काय ? सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा प्रस्ताव हा नेमका कुणाचा आहे याची माहिती आहे काय? खाण लॉबीकडून या आमदारांना वेड्यात काढण्यात येत आहे याची कल्पना यांना आहे काय ? असे एक नव्हे तर अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत. लोकांची फसवणूक चालली असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

या आमदारांनी खाण मालकांचे प्रस्ताव घेवून दिल्लीला जाण्याऐवजी आपल्या मतदारांचे प्रस्ताव अगोदर पुढे रेटावेत. आपल्या मतदारांना अगोदर या प्रस्तावाबद्दल विचारा आणि नंतरच पुढची पावले ऊचला. लोकांना गृहीत धरून चालू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने खाणींची नुतनीकरणे बेकायदेशीर ठरविली आहेत. त्यामळे या खाणीची मालकी खाण लॉबीकडे नसून या खाणी राज्याच्या आहेत. आमदार व मंत्री त्याचे चौकीदार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण लॉबीच्या दबावापुढे झुकून लिलाव करण्याऐवजी बेकायदेशीररित्या खाणींचे नूतनीकरण केले आणि हा संपूर्ण घोळ करून टाकला. जनतेने याचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. खुद्द राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल खाणींचा लिलाव करायला सांगतात तेव्हा हा त्यांचा कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी का मानला नाही याचाही जाब विचारायला हवा असे रेजिन्लाड यांनी म्हटले आहे.