शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उन्हाळ्यात आरोग्यासाठी कुठले पाणी पिणे योग्य? फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठ सरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 10:42 IST

थंडीचे दिवस मागे पडले आणि उन्हाळ्यातील सूर्याने उष्मा वाढवण्यास आरंभ केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: थंडीचे दिवस मागे पडले आणि उन्हाळ्यातील सूर्याने उष्मा वाढवण्यास आरंभ केला आहे. उष्मा वाढला की घशाला कोरड पडू लागते. कोरड वाढली की तहान भागवण्यासाठी पाण्याची आठवण येते. पाणी म्हटले की फ्रिजमधील की घराबाहेर असल्यास थंडगार पेय खरेदी करून पिऊन तहान भागवली जाते.

घटाघटा पाणी पिऊनसुद्धा तहान मात्र भागत नाही. उलट जास्त पाणी प्यावेसे वाटते. अशावेळी माठातल्या पाण्याची सर फ्रिजमधील पाण्याला कशी येणार. माठातले पाणी पिल्यावर नक्कीच तहान दूर होण्यास मदत होत असते, तसेच माठातल्या पाणी आरोग्यासाठी बरेच लाभदायी ठरत असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, माठातील पाणी शरिरासाठी अत्यंत योग्य आहे. माठातले पाणी पिल्यामुळे कोणत्याही प्रकाराचे त्रास होत नाही. नैसर्गिकरित्या पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया माठात होते. 

चार तासांत होतेय पाणी शुद्ध 

तज्ज्ञांच्या मतानुसार माठात ४ तासांपेक्षा जास्तवेळ पाणी राहिल्यास ते नैसर्गिकदृष्ट्या शुद्ध होत असते. याचे कारण म्हणजे माठातील मातीमध्ये नैसर्गिकरित्या पाण्यातील दूषित घटक शोषून काढून पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते.

४५० रुपयांपासून विक्री

म्हापशातील प्रसिद्ध अशा बाजारपेठेत गेल्यावर्षी साधारण लहान आकाराच्या माठाची किंमत ३०० रुपयांपासून सुरु होत होती. यंदा मात्र त्यात अंदाजित ५० टक्क्यांनी वाढ होऊन माठ ४५० रुपयांपासून विकला जातो. मोठ्या आकाराचे माठ अंदाजे ७०० रुपयांना विकले जात आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने माठच योग्य

माठातले पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवले जाते, नैसर्गिकरित्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होते, घशावर परिणाम होत नाही, अॅसिडिटी दूर होण्यास मदत होते. या विविध कारणास्तव माठातील पाणी पिणे लाभदायी असते.

- फ्रिजमधील थंड पाणी पिल्यास आपण अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकतो.

- अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यात घसा दुखणे, घशाचा संसर्ग, खोकला, ताप, डोके दुखणे बद्धकोष्ठता, प्रतिकार शक्ती कमी होणे, यांसारखे प्रकार होऊ शकतात.

- बाहेरील उष्मातून घरात प्रवेश केल्यानंतर लगेचच फ्रिजमधील पाणी पिल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

- फ्रिजमधील पाणी जरी थंड असले तरी त्याचे तापमान अतिकमी असल्यामुळे शरीरात कफ वाढून सर्दीचा त्रास जास्त होऊ शकतो. माठात ठेवलेले पाणी हे मातीचे बनलेले असल्यामुळे आयुर्वेदानुसार हे पाणी शरीरास थंडावा देतेच. पण तहान शमवते म्हणून गरम पाणी माठात ठेवून ते गार होईपर्यंत ठेवावे व नंतर त्या वेळेस असे केल्याने आपल्याला थंडावा ही मिळतो आणि आपली तहानही भागते. - डॉ. आदित्य बर्वे, आयुर्वेदिक तज्ज्ञ

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा