शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

जिथे स्कूलबस नाही, तिथे सरकारची सायकल; आदिवासी भागातील २५० विद्यार्थ्यांना वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:43 IST

 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्कूल बस ज्या भागांमध्ये पोहोचत नाही, तेथील शाळकरी मुलांना सरकार सायकली देणार आहे. तसेच इलेक्ट्रिकल व सीएनजी वाहनांचाच अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. 

पर्वरी येथे जीसीए मैदानावर झालेल्या कार्यक्रमात आरबीएल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत २५० शाळकरी मुलांना मोफत सायकलींचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके व आरबीएल बँकेचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात काही तालुक्यांमध्ये अजूनही अशी गावे आहेत की तेथे स्कूल बस पोहोचत नाही. मुलांना अर्धा ते एक किलोमीटर चालत यावे लागते. खासकरून आदिवासी कुटुंबांमधील मुलांना त्रास सहन करावा लागतो. ज्यांच्या घरात वाहन नाही, सायकलदेखील नाही, अशा कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना या २५० सायकली देण्यात आलेल्या आहेत. कालांतराने इतर गरजू विद्यार्थ्यांनाही दिल्या जातील. 'आझादी का अमृतकाल' अंतर्गत २५ वर्षांचा कालावधी नजरेसमोर ठेवून विकास केला जाईल. 

पत्रकारांना ई-बाईक 

पत्रकारांनाही ई-बाईक देण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी लवकरच योजना आणली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, पर्यावरणाभिमुख वाहनांचा वापर व्हायला हवा, तरच प्रदूषण दूर होईल. त्यासाठी चार्जिंगकरिता येणारी इलेक्ट्रीकल वाहने तसेच सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना सरकार प्रोत्साहन देणार आहे. गोवा माइल्सने अलिकडेच सीएनजीवर चालणाऱ्या ५५ टॅक्सी पेडणेतील लोकांना प्रदान केल्या.

शेतकरी, दूध उत्पादक, मच्छिमारांना सबसिडी

शेतकरी, दूध उत्पादक, मच्छिमारांना सबसिडी दोन ते तीन महिन्यांच्या आत मिळायलाच हवी, असे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी आरबीएल बँकेशी हातमिळवणी करण्यात येईल. प्रक्रियेमुळे अनेकदा सबसिडीला विलंब होतो. तसे होऊ न देण्याची खबरदारी सरकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शैक्षणिक योजना, उपक्रमांच्या बाबतीत सरकारने एक्सिस बँकेकडे हातमिळवणी केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत