शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रामराज्य आहे कुठे? विजय सरदेसाई, महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थाप्रश्नी सरकारला घेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2024 09:32 IST

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी ते पुन्हा एकदा मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील वाढती बेकारी, महागाई, बिघडलेली कायदा सुव्यस्था, ढासळत चाललेले पर्यटन पाहता राज्यात रामराज्य आहे तरी कुठे, असा प्रश्न पडत असल्याचे प्रतिपादन करीत उद्यापासून सुरू होणार असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारलाघेरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'सरकारकडे इव्हेंटवर उधळपट्टी करण्यासाठी पैसा आहे; परंतु माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या महिला सेल्फ हेल्प ग्रुप्सची बिले फेडण्यासाठी पैसे नाहीत. येत्या २४ एप्रिलनंतर या महिलांचे भवितव्य अंधकारमय बनणार आहे. कारण, कंत्राटाची मुदत संपत असून, अक्षयपात्रा या परप्रांतीय संस्थेला कंत्राट देण्याचे घाटत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये या गटांना कॅन्टीन चालवायला देऊ, असे सांगून सरकारने तोंडाला पाने पुसली.'

आरोग्यसेवेतील कमतरता शेतीविषयक समस्या, वारसास्थळांकडे दुर्लक्ष, राज्याचे वाढते कर्ज, पाणथळ जागांभोवतीचा बफर झोन, मडगाव पालिकेतील गैरव्यवहार आदी विषयांवर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'राज्याच्या डोक्यावरील कर्ज ३६ हजार कोटींवर पोहोचले आहे. बांगलादेशी गोव्यातून पासपोर्ट मिळवतात व त्यांना पुण्यात पोलिस पकडतात. बोगस नावाने वाहने हस्तांतरित केली. गोव्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे.'

गोव्यातील जीआय टॅग मिळालेला काजू असो की वांगी, या वस्तूंच्या संवर्धनात सरकार अपयशी ठरले आहे. कदंबकडे बसगाड्या नाहीत. पणजी ते मडगाव मार्गावर बसचा तुटवडा आहे. कृषी अनुदान वितरणास विलंब होत आहे.

सरदेसाई म्हणाले की, तब्बल ९२ कोटींच्या किनारा सफाई निविदांची छाननी झाली पाहिजे. हे काम महिला स्वयंसाहाय्य गटांकडे देता आले असते; परंतु हप्ते हवे असल्याने निविदा काढल्या, असा आरोप त्यांनी केला. सीआरझेड क्षेत्रातील विध्वंस आणि जलक्रीडा ऑपरेटरच्या छळाचा उल्लेख करताना, त्यांनी स्थानिकांना मासेमारी सोडून सरकारने पर्यटनाकडे वळवण्यास सांगितले आणि नंतर विश्वासघात केला, अशी टीका केली. वनखात्याची ५०० हंगामी कर्मचाऱ्यांना गेली ८ वर्षे वेतनवाढ मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

'८० टक्के नोकऱ्या राखीवतेबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल'

खाजगी उद्योग, आस्थापनांमध्ये गोवेकरांना ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यासाठी जे खाजगी विधेयक आपण विधानसभेत मांडणार आहोत, त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, २०१९ पासून हे विधेयक मी मांडत आहे; परंतु प्रत्येक वेळी कायदा खात्याकडे पाठवले जाते. मुदत टळली की, ते बाद ठरले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी ते पुन्हा एकदा मांडले आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायलाच हवी.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण