शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रामराज्य आहे कुठे? विजय सरदेसाई, महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थाप्रश्नी सरकारला घेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2024 09:32 IST

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी ते पुन्हा एकदा मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील वाढती बेकारी, महागाई, बिघडलेली कायदा सुव्यस्था, ढासळत चाललेले पर्यटन पाहता राज्यात रामराज्य आहे तरी कुठे, असा प्रश्न पडत असल्याचे प्रतिपादन करीत उद्यापासून सुरू होणार असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारलाघेरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'सरकारकडे इव्हेंटवर उधळपट्टी करण्यासाठी पैसा आहे; परंतु माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या महिला सेल्फ हेल्प ग्रुप्सची बिले फेडण्यासाठी पैसे नाहीत. येत्या २४ एप्रिलनंतर या महिलांचे भवितव्य अंधकारमय बनणार आहे. कारण, कंत्राटाची मुदत संपत असून, अक्षयपात्रा या परप्रांतीय संस्थेला कंत्राट देण्याचे घाटत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये या गटांना कॅन्टीन चालवायला देऊ, असे सांगून सरकारने तोंडाला पाने पुसली.'

आरोग्यसेवेतील कमतरता शेतीविषयक समस्या, वारसास्थळांकडे दुर्लक्ष, राज्याचे वाढते कर्ज, पाणथळ जागांभोवतीचा बफर झोन, मडगाव पालिकेतील गैरव्यवहार आदी विषयांवर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'राज्याच्या डोक्यावरील कर्ज ३६ हजार कोटींवर पोहोचले आहे. बांगलादेशी गोव्यातून पासपोर्ट मिळवतात व त्यांना पुण्यात पोलिस पकडतात. बोगस नावाने वाहने हस्तांतरित केली. गोव्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे.'

गोव्यातील जीआय टॅग मिळालेला काजू असो की वांगी, या वस्तूंच्या संवर्धनात सरकार अपयशी ठरले आहे. कदंबकडे बसगाड्या नाहीत. पणजी ते मडगाव मार्गावर बसचा तुटवडा आहे. कृषी अनुदान वितरणास विलंब होत आहे.

सरदेसाई म्हणाले की, तब्बल ९२ कोटींच्या किनारा सफाई निविदांची छाननी झाली पाहिजे. हे काम महिला स्वयंसाहाय्य गटांकडे देता आले असते; परंतु हप्ते हवे असल्याने निविदा काढल्या, असा आरोप त्यांनी केला. सीआरझेड क्षेत्रातील विध्वंस आणि जलक्रीडा ऑपरेटरच्या छळाचा उल्लेख करताना, त्यांनी स्थानिकांना मासेमारी सोडून सरकारने पर्यटनाकडे वळवण्यास सांगितले आणि नंतर विश्वासघात केला, अशी टीका केली. वनखात्याची ५०० हंगामी कर्मचाऱ्यांना गेली ८ वर्षे वेतनवाढ मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

'८० टक्के नोकऱ्या राखीवतेबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल'

खाजगी उद्योग, आस्थापनांमध्ये गोवेकरांना ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यासाठी जे खाजगी विधेयक आपण विधानसभेत मांडणार आहोत, त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, २०१९ पासून हे विधेयक मी मांडत आहे; परंतु प्रत्येक वेळी कायदा खात्याकडे पाठवले जाते. मुदत टळली की, ते बाद ठरले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मी ते पुन्हा एकदा मांडले आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायलाच हवी.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण