शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फिरत राहिलात आम्ही सरकार बनवले, पर्रिकरांचा दिग्विजय सिंहांना टोला

By admin | Updated: March 31, 2017 18:46 IST

गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही.

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा नवी दिल्ली, दि. 31 - ‘गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही. तुम्ही गोव्यात फिरत राहिलात आणि इकडे आम्ही सरकार बनवले’ हे उद्गार आहेत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे. राज्यसभेत दिग्विजय सिंगांचे नाव न घेता (मात्र त्यांच्याकडे पाहत) पर्रिकर बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शुक्रवारी शून्यप्रहरात अचानक पर्रिकर राज्यसभेत अवतरले आणि सभागृहात काही काळ घोषणाबाजी झाली.गोव्यात 22 आमदारांच्या पाठिंब्यावर 14 मार्च रोजी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तथापि राज्यसभेचा त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. माजी संरक्षण मंत्र्यांचे सभागृहात आगमन होताच, सभापतींच्या आसनासमोर काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाने गैरमार्गाचा अवलंब करीत गोव्यात बहुमत मिळवले, असा आरोप काँग्रेस सदस्य करीत होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे सदस्यही मग आपापल्या जागेवर उठून म्हणाले, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ तुमच्याकडे होते कुठे, तुम्ही तर पाठिंब्याचे केवळ आकडेच फुगवित बसला होता. दरम्यान, काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी पर्रिकरांना प्रश्न विचारला तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. उपसभापती कुरियन त्यांचा बचाव करीत म्हणाले, किमान पक्षी महिला सदस्यांचा तर सन्मान ठेवा. यानंतर पाटील यांनी रासायनिक खतांबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्रिकर बोलायला उभे राहताच काँग्रेसचे राजीव गौडा, हुसेन दलवाई, रजनी पाटील यांनी व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. पाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंग व बी. के. हरिप्रसादही पर्रिकरांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मिश्कीलपणे म्हणाले, पर्रिकरांनी दिग्विजय सिंगांना यापूर्वीच ‘खास धन्यवाद’ दिले आहेत.गोव्यात काँग्रेसला 40 पैकी सर्वाधिक 17 तर भाजपाला 13 जागा मिळाल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डच्या प्रत्येकी 3 अशा 6 आमदारांनी, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव व अन्य २ आमदारांनी पर्रिकरांना पाठिंबा दिल्यामुळे २२ सदस्यांच्या बळावर गोव्यात भाजपने सरकार बनवले.