शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

तुम्ही फिरत राहिलात आम्ही सरकार बनवले, पर्रिकरांचा दिग्विजय सिंहांना टोला

By admin | Updated: March 31, 2017 18:46 IST

गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही.

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा नवी दिल्ली, दि. 31 - ‘गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही. तुम्ही गोव्यात फिरत राहिलात आणि इकडे आम्ही सरकार बनवले’ हे उद्गार आहेत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे. राज्यसभेत दिग्विजय सिंगांचे नाव न घेता (मात्र त्यांच्याकडे पाहत) पर्रिकर बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शुक्रवारी शून्यप्रहरात अचानक पर्रिकर राज्यसभेत अवतरले आणि सभागृहात काही काळ घोषणाबाजी झाली.गोव्यात 22 आमदारांच्या पाठिंब्यावर 14 मार्च रोजी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तथापि राज्यसभेचा त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. माजी संरक्षण मंत्र्यांचे सभागृहात आगमन होताच, सभापतींच्या आसनासमोर काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाने गैरमार्गाचा अवलंब करीत गोव्यात बहुमत मिळवले, असा आरोप काँग्रेस सदस्य करीत होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे सदस्यही मग आपापल्या जागेवर उठून म्हणाले, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ तुमच्याकडे होते कुठे, तुम्ही तर पाठिंब्याचे केवळ आकडेच फुगवित बसला होता. दरम्यान, काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी पर्रिकरांना प्रश्न विचारला तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. उपसभापती कुरियन त्यांचा बचाव करीत म्हणाले, किमान पक्षी महिला सदस्यांचा तर सन्मान ठेवा. यानंतर पाटील यांनी रासायनिक खतांबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्रिकर बोलायला उभे राहताच काँग्रेसचे राजीव गौडा, हुसेन दलवाई, रजनी पाटील यांनी व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. पाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंग व बी. के. हरिप्रसादही पर्रिकरांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मिश्कीलपणे म्हणाले, पर्रिकरांनी दिग्विजय सिंगांना यापूर्वीच ‘खास धन्यवाद’ दिले आहेत.गोव्यात काँग्रेसला 40 पैकी सर्वाधिक 17 तर भाजपाला 13 जागा मिळाल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डच्या प्रत्येकी 3 अशा 6 आमदारांनी, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव व अन्य २ आमदारांनी पर्रिकरांना पाठिंबा दिल्यामुळे २२ सदस्यांच्या बळावर गोव्यात भाजपने सरकार बनवले.