शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चिंबल जंक्शनवरील वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2024 14:03 IST

याचा त्रास भर उन्हात काेंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना होत आहे.

नारायण गावस, पणजी: चिंबल जंक्शनवरील वाहतूक कोंडीतू्न सुटका कधी? असा प्रश्न आता वाहनचालकांना पडत आहे. फक्त सकाळ सायं कामाच्या वेळी नाहीतर भर उन्हात दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक काेंडीची रांग लागलेली असते. उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असल्याने येथे वाहतूक काेंडी होत असते याचा त्रास भर उन्हात काेंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना होत आहे.

रायबंदरमध्ये  स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने हा रस्ता ठिकठिकाणी खाेदला आहे. त्यामुळे  रायबंदर मार्गावरुन ओल्ड गोवाला जाणारी सर्व माेठी वाहने  या महामार्गाने जातात. यातच या उड्डाण पुलाचे काम सुरु  असल्याने वाहनाच्या रांगा लागत असतात. या ठिकाणी सिग्नल आहे तरी वाहनांची संख्या वाढल्याने सिग्नल पडल्यावर माेठी रांग लागत असते. आता भर उन्हाचा प्रचंड मारा बसत असल्याने याचा फटका वाहतूक कोंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना जास्त बसतो. येथे पुलाच्या बांधकामामुळे अगोदरच धूर पसरली आहे. त्यातच उष्णता आणि वाहतूक काेंडी यामुळे वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. 

रुग्णवाहीकांना होतो त्रास

या महामार्गावरुन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना या वाहतूक काेंडीचा त्रास  सहन करावा लागतो. लांबच लांब रांगा लागल्यावर रुग्णवाहीकांना जाता येत नाही. त्यामुळे रुग्णांना याचा फटका बसतो. तसेच कामगारांना कार्यालयात पाेहचताना उशीर होत आहे. महाविद्यालयातील तसेच शाळेतील वेळेत पाेहचत नाही सर्व बसेस या वाहतूक काेंडीत अडकून पडतात.

पुन्हा मेरशे सर्कल काेंडी

चिंबल जंक्शन कसेबसे पार केल्यावर पुन्हा वाहनचालकांना मेरशे सर्कलवर वाहतूक काेंडीचा सामना करावा लागतो. याठिकाणी सिग्नलवर किमान १० मिनिट तरी वेळ वाया जात असतो. वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालकांचा वेळ वाया जातो. यामुळे लोकांना पणजीत शहरात येण्यासाठी  वेळ वाया घालावा लागतो. या वाहतूक काेंडीतून सुटका मिळणार कधी असा प्रश्न लोकांना पडत आहे.

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी