शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

नव्या राज्यपालांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:19 IST

गोव्याला नव्या राज्यपालांची गरज होतीच.

गोव्याला नव्या राज्यपालांची गरज होतीच. मूळ आंध्र प्रदेशमधील पुसापती अशोक गजपती राजू हे आता दोनापावल काबो येथील राजभवनचा ताबा घेतील. काल राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीबाबतचा आदेश जारी केला. राज्यपालपद हे मौजेचे किंवा टाइमपास करण्याचे पद नव्हे. आपल्या नातेवाईकांचाच राजभवनवर पाहुणचार घडवून आणण्यासाठी राजभवन नसते. अर्थात गोव्याचे सध्याचे राज्यपाल अशा प्रकारे वागत नव्हते. मात्र त्यांच्या वारंवार केरळवाऱ्या असायच्या. दर शनिवारी ते केरळला जायचे. आपल्या मूळ भूमीची त्यांना खूप ओढ आहे, हे कदाचित केंद्र सरकारच्याही लक्षात आले असावे. राज्यपालांना बरेच घटनात्मक अधिकार असतात. त्यांनी गोव्याची सेवा करण्यासाठीच अधिकाधिक वेळ द्यायला हवा. कुलपती या नात्याने गोवा विद्यापीठाचीही सूत्रे त्यांच्या हाती असतात. विद्यापीठ कारभारात चांगले बदल घडवून आपला ठसा कुलपती म्हणूनही उमटविण्याची संधी राज्यपालांना असते. पिल्लई यांनी कुलपती पदाला किती न्याय दिला यावर विविध मते असू शकतात. 

गोव्याला यापूर्वीच्या काळात लाभलेले काही राज्यपाल वादग्रस्त ठरले. त्यांनी पक्षीय राजकारणात अधिक रस घेतला. काहींनी सरकारे घडविणे, पाडणे अशा प्रक्रियेत इंटरेस्ट दाखवला. एस. सी. जमीर, भानूप्रकाश सिंग वगैरेंची नावे त्यासाठी घ्यावी लागतील. जे. एफ. जेकब, श्री. साहनी किंवा श्री. भारत वीर वांच्छू यांच्यासारखे काही चांगले व खमके राज्यपालही गोव्याला लाभले. बिहारहून आलेल्या व अलीकडेच निधन पावलेल्या मृदुला सिन्हा यांनीही गोव्यात चांगले काम केले. सरकारने एका मंत्र्याच्या शिक्षेविषयी केलेली वादग्रस्त शिफारस सप्टेंबर २०१५ मध्ये फेटाळून लावण्याचे धाडसदेखील मृदुला सिन्हा यांनी दाखवले होते. 

पी एस श्रीधरन पिल्लई यांनीही गोव्यात शांतपणे व लो-प्रोफाईल राहून काम केले. त्यांनी राजकारणात नको तेवढा रस कधी घेतला नाही आणि सरकार घडविणे किंवा पाडण्याच्या प्रक्रियेत भाग घेण्याची संधीही त्यांना कधी मिळाली नाही. केंद्राने त्यांना तशी संधी दिलीही नाही. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांची घाऊक पक्षांतरे ही विनाव्यत्यय पार पडली. राज्यपालांनी गोव्यातील सर्व राजकारण्यांचे सगळे खेळ शांतपणे पाहिले, अनुभवले. पूर्वी सत्यपाल मलिक यांच्यासारखा अत्यंत धाडसी व स्पष्ट बोलणारा राज्यपालही गोव्याने पाहिला. स्पष्ट बोलतात म्हणून त्यांची गोव्याहून बदली केली गेली. मात्र अनेक गोंयकारांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते. 

गोव्यात येणारे नवे राज्यपाल हे ७४ वर्षांचे आहेत. केंद्रात मोदींच्याच मंत्रिमंडळात पूर्वी त्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री म्हणून काम केले आहे. ते राजघराण्यातील आहेत. विझियानगरच्या शेवटच्या महाराजांचे ते कनिष्ठ पुत्र आहेत. त्यांनी पूर्वी आंध्र प्रदेशमध्ये आमदार म्हणूनही पंचवीस वर्षे काम केले. त्यापैकी तेरा वर्षे ते आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री होते. खूप अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गोव्यात काही राज्यपालांची साहित्यिक प्रतिभा अधिक फुलली. मृदुला सिन्हा कवयित्री, लेखिका होत्या. त्यांनी गोव्यातील एका महत्त्वाच्या कवी संमेलनात भाग घेऊन कविताही सादर केल्या होत्या. त्यांनी गोव्यातील वास्तव्यात काही पुस्तके लिहिली. पी एस श्रीधरन पिल्लई यांनी तर बरीच, भरपूर पृष्ठांची जाडजूड व किमती पुस्तके प्रकाशित केली. त्यांच्यातील लेखकाचे झाड गोव्याच्या सुपीक भूमीत अधिक डंवरले. गोव्यातील कोणत्याही नेत्याने किंवा एनजीओने, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली तर पिल्लई वेळ द्यायचे. निवेदन स्वीकारून ते गोव्यात नेमके काय चाललेय हे जाणून घ्यायचे. वेळ असेल तर मनमोकळ्या गप्पा करणे त्यांना आवडायचे. ते सामान्यांमध्ये मिसळले. मात्र काही वादाच्या विषयांवर गोवा सरकारचे कान पिळण्याचे धारिष्ट्य त्यांना दाखविता आले नाही. 

कदाचित आपलाही सत्यपाल मलिक व्हायला नको याची त्यांनी अधिक काळजी घेतली असावी. पुसापती अशोक राजू यांना राज्यपाल या नात्याने गोव्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. गोव्यातील लोकांचा आवाज खऱ्या अर्थाने ऐकणारा सरकारमध्ये कुणी नाही. अशावेळी लोकांना वारंवार राजभवनवर धाव घ्यावी लागते. विरोधी पक्ष गलितगात्र झालेला आहे. त्याचे बरेचसे श्रेय भाजपला जाते. सत्ता हाती आली की, कितीही अन्य पक्षीय आमदार आपल्याकडे खेचून आणता येतात हे भाजपने दाखवून दिले. नव्या राज्यपालांचे गोव्यात स्वागतच असेल.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण