शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गोव्यासाठी असलेले पुण्यातील हरित लवादाचे पीठ कायम, आपकडून न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 20:35 IST

गोव्यासाठी असलेले पुणे येथील हरित लवादाचे पीठ कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे.

पणजी : गोव्यासाठी असलेले पुणे येथील हरित लवादाचे पीठ कायम ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे.

आपच्यावतीने पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मनोहर पर्रीकर यांच्या सरकारला चांगला धक्का बसला आहे. पुणे येथील हरित लवादाचे पीठ दिल्लीला हलविण्यासाठी मनोहर पर्रीकर सरकारचा प्रयत्न होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार तोंडावर आपटले असून, राज्यातील पर्यावरणवादी आणि पर्यावरण -हासाविरुद्ध सक्रिय काम करणा-या लोकांना अडथळा आणण्याचा सरकारचा डाव होता. 

राज्यातील 60 टक्के दावे पुण्यातील लवादापुढे दाखल झालेले आहेत. त्यामुळे हरित लवादाचे पीठ गोव्यातच असावे, ही मागणी आप लावून धरेल, असेही गोम्स यांनी नमूद केले आहे. 

दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे गोव्यासाठी दिवाळी आणि ख्रिसमसची बेट आहे. गोव्यातील सामान्य जनतेला दिलासा देत न्यायालयाने आपली ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी दिली आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीgoaगोवा