शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2024 11:52 IST

आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत केली. तसेच यापूर्वी ज्यांची नुकसान भरपाई देणे बाकी आहे, त्यांनाही दोन दिवसांत भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. इतर आमदारांनीदेखील ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वास यांनीही आपल्या मतदारसंघात अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. सभापती रमेश तवडकर यांनीही नुकसानीचे चित्र मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.

'इंडिया आघाडी' दिशाभूल करतेय

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे त्यांना भडकवू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांची दिशाभूल करण्याचे काम इंडिया आघाडीकडून सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावर विरोशी आमदारही खवळले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन