शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2024 11:52 IST

आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत केली. तसेच यापूर्वी ज्यांची नुकसान भरपाई देणे बाकी आहे, त्यांनाही दोन दिवसांत भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आमदार नीलेश काब्राल यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा शून्य तासात लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. इतर आमदारांनीदेखील ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वास यांनीही आपल्या मतदारसंघात अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. सभापती रमेश तवडकर यांनीही नुकसानीचे चित्र मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.

'इंडिया आघाडी' दिशाभूल करतेय

विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे त्यांना भडकवू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांची दिशाभूल करण्याचे काम इंडिया आघाडीकडून सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावर विरोशी आमदारही खवळले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन